Advertisement

मंगळवार, २८ जून, २०१६

प्रयोग Prayog

प्रयोग


कर्ता, कर्म व क्रियापद यांच्यामधील परस्पर संबंध व्यक्त करणाऱ्या रचनेला प्रयोग म्हणतात. कत्योची किंवा कर्माची क्रियापदाशी विशिष्ट प्रकारची जुळणी या रचना निगडित असणे म्हणजे प्रयोग.
१) कर्तरी प्रयोग - जेव्हा वाक्यातील क्रियापद हे कर्त्याच्या लिंग, वचन व पुरुष यांच्याप्रमाणे बदलते, तेव्हा कर्तरी प्रयोग होतो.
२) कर्मणी प्रयोग - जेव्हा वाक्यातील क्रियापद हे कर्माच्या लिंग, वचन व पुरुष यांच्याप्रमाणे बदलते, तेव्हा कर्मणी प्रयोग होते.
३) भावे प्रयोग - जे वाक्यात क्रियापद हे किंवा कर्म यांच्या लिंग, वचन, पुरुषाप्रमाणे न बदलता स्वतंत्र राहते, व नेहमी नपुंसक लिंगी तृतीय पुरुषी एकवचन असते तेव्हा तो भावे प्रयोग आहे.

सोमवार, २७ जून, २०१६

समास Samas, marathi grammar samas

समास

शब्दांच्या एकत्रीकरणास समास म्हणतात.  दोन शब्दांचे एकत्रीकरण करून जोडशब्द तयार करताना या दोन शब्दांतील परस्परसंबंध दर्शविणारे शब्द अथवा प्रत्यय वगळले जातात.
समासाचे ४ प्रकार आहे -
१) अव्ययीभाव समास
२) तत्पुरुष समास
३) कर्मधारय समास
४) व्दिगु समास
दोन किंवा अधिक पदे परस्पर संबंधामुळे एकत्रित करण्यालाच समास म्हणतात.
(सम् + अस्) एकत्र करणे असा समास करताना त्या दोन पदांतील परस्पर संबंध सूचित करणारे प्रत्यय, अव्यये किंवा अन्य शब्द गाळले जातात.


 

गुरुवार, २१ जानेवारी, २०१६

Republic day, प्रजासत्ताक दिन

दरवर्षी जानेवारी महिन्याच्या सव्वीस तारखेला भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. भारतीय सन-उत्सव साजरे करण्यात नेहमी अग्रभागी आहे. वेगवेगळ्या धर्माचे सण आम्ही सारख्याच उत्साहाने साजरे करत आहे. पण सर्व भारतीयांना अभिमान वाटावा असे काही राष्ट्रीय दिनही आम्ही साजरे करतो. भारत एक मोठे लोकशाही राज्य आहे. म्हणजे हे लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी चालवलेले राज्य आहे. हा अधिकार भारताच्या जनतेला घटनेनुसार २६ जानेवारी १९५० साली मिळाला. त्या दिवसापासून भारतात प्रजेची सत्ता सुरू झाली. म्हणून दरवर्षी २६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून पाळला जातो. या समारंभाचा मुख्य कार्यक्रम भारताची राजधानी दिल्ली येथे होतो. या समारंभात भारतातील सर्व घटकराज्ये भाग घेतात. भारताच्या सर्व क्षेत्रांतील वैभवाचे दर्शन घडवणारी भलीमोठी मिरवणूक काढतात. प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात आणि गावागावातून प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. धाडसी मुलांचा आणि विविध क्षेत्रांत कर्तुत्व गाजवणार्र्यांचा या दिवशी सरकारतर्फे गौरव केला जातो.
शाळेतही प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्यासाठी झेंडे-पताका यांनी शाळा सजवली जाते. सर्व विद्यार्थी, अध्यापक, मुख्याध्यापक यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण केले जाते. शाळेतील एन्.सी.सी. व स्काऊटचे विद्यार्थी सुंदर संचालन करतात. शाळेतील वाद्यवृंदावरही राष्ट्रीय गाणी वाजवली जातात. आम्ही सर्वजण राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतो. प्रमुखाध्यापक गुणी विद्याथ्र्यांचे कौतुक करतात. असे राष्ट्रीय दिन साजरे केल्यामुळे प्रत्येकाच्या मनातील राष्ट्रीय भावना, राष्ट्रप्रेम अधिक उजळून निघते. प्रजासत्ताक दिन याला गणतन्त्र दिन, गणराज्य, Republic day असे ही म्हणतात.
संविधान सभेने भारताचे संविधान तयार करण्याचे काम १९४६ साली सुरू केले. संविधान समितीत डॉ. राजेंद्रप्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलम आझाद, सरोजिनी नायडू, जे.बी. कृपलानी, राजकुमारी अमृत कौर, दुर्गावाई देशमुख, हंसाबेन मेहता असे अनेक मान्यवर सदस्य होते. संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी या सभेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समिती नियुक्त केली. स्वतंत्र भारताचे संविधान २६ जानेवारी १९५० रोजी अमलात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे 'भारतीय संविधानाचे शिल्पकार' आहेत. ब्रिटिश साम्राज्यवादाविरुद्ध लढताना स्वातंत्र्य, समता, बंधुता व लोकशाही या मुल्यावरील निष्ठा भारतीयांनी उराशी बाळगल्या होत्या. या मूल्यांच्या पायावरच आपल्या संविधानाची उभारणी झाली आहे. त्याचबरोबर स्वातंत्र्य लढ्यात लढणाऱ्या वीरांचे चीज झाले. या दिवशी देशाने राष्ट्रीय सुट्टी म्हणून जाहीर केली. सन १९५० पासून आतापर्यंत हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.

सोमवार, २२ जून, २०१५

स्वरसंधीचे नियम Swarsandhi niyam

नियम १ : दोन सजातीय स्वर एकापुढे एक आले असता त्यांचा संधी होऊन त्या दोहोंबद्दल त्याच जातीतील दीर्घ स्वर होतो.
१) सूर्य + अस्त       अ + अ = आ    सूर्यास्त
२) हिम + आलय     अ + आ = आ    हिमालय
३) विद्या + अर्थी      आ + अ = आ    विद्यार्थी
४) विद्या + आलय    आ + आ = आ    विद्यालय                                                                                   
५) कवी + इच्छा     इ + इ = ई       कवीच्छा
६) गिरी + ईश       इ + ई = ई       गिरीश
७) रावी + इंद्र       ई + इ = ई       रवींद्र
८) मही + ईश       ई+ ई  = ई       महीश
९) गुरू+ उपदेश      उ +उ =  ऊ       गुरुपदेश
१०) भू + उद्धार      ऊ + उ = ऊ       भूद्दार

नियम २ : अ किंवा आ यांच्यापुढे इ किंवा ई आल्यास त्या  दोहोंऐवजी 'ए' येतो.
१) ईश्वर + इच्छा अ + इ = ए  ईश्वरेच्छा
२) गण + ईश   अ + ई = ए गणेश
३) महा + इंद्र   आ + इ = ए महेंद्र
४) रमा + ईश   आ + ई = ए रमेश

नियम ३ : अ किंवा आ यांच्यापुढे उ किवा ऊ आल्यास त्या दोहोंऐवजी 'ओ' येतो.
१) सूर्य + उदय   अ + उ = ओ    सूर्योदय
२) समुद्र + ऊर्मी  अ + ऊ = ओ   समुद्रोमी
३) गंगा + उदक  आ + उ = ओ   गंगोदक
४) गंगा + ऊर्मी  आ + ऊ = ओ   गंगोर्मी

नियम ४ : अ किंवा आ यांच्यापुढे ए किंवा ऐ आल्यास त्या दोहोंऐवजी 'ऐ' होतो.
१) एक + एक     अ + ए  = ऐ   एकैक
२) मत + ऐक्या   अ + ऐ  =  ऐ  मतैक्य
३) सदा + एव    आ + ए  = ऐ   सदैव
४) प्रजा + ऐक्य   आ + ऐ =  ऐ  प्रजैक्य

नियम ५ : अ किंवा आ यांच्यापुढे ओ किंवा औ आल्यास त्या दोहोंऐवजी 'औ' येतो.
१) जल + ओघ      अ + ओ = औ  जलौघ
२) वृक्ष + औदार्य    अ + औ = औ  वृक्षौदर्य
३) गंगा + ओघ     आ + ओ = औ  गंगौघ
४) महा + औदार्य   आ + औ = औ  महौदार्य

नियम ६ : अ किंवा आ यांच्यापुढे ऋ आल्यास त्या दोहोंऐवजी 'अर्' येतो.
१) देव + ऋषी   अ + ऋ = अर्  देवर्षी
२) महा + ऋषी  अ + ऋ = अर्  महर्षी

नियम ७ : इ, उ, ऋ या ह्रस किंवा दीर्घ स्वरांपुढे कोणताही विजातीय स्वर आल्यास 'त' च्या जागी अनुक्रमे य्, व् र् हे येतात आणि त्यांत पुढील स्वर मिळतो.
१) प्रीति + अर्थ    इ + अ  = य् + अ  = य    प्रीत्यर्थ 
२) अति + उत्तम    इ + उ = य् + उ = यु    अत्त्युतम
३) किती + एक    ई + ए = य् + ए = ये    कित्येक
४) सु + अल्प     उ + अ = व् +अ = व    स्वल्प
५) मनु + अंतर    उ + अ = व् + अ = व    मन्वंतर
६) भानू + ईश्वर    ऊ + ई = व् + ई = वी   भान्वीश्वर
७) पितृ + आज्ञा   ऋ + आ = र् + आ = रा    पित्राज्ञा

नियम ८ : ए, ऐ, ओ, औ यांच्यापुढे कोणताही स्वर आल्यास त्यांच्या जागी अनुक्रमे आय्, अव्, आव् हे येतात आणि त्यांत पुढील स्वर मिळतो.
१) ने + अन    ए + अ = अय्  +अ = अय   नयन
२) गै + अन    ऐ + अ = आय् + अ = आय  गायन
३) गो + ईश्वर  ओ + ई = अव् + ई = अवी   गावीश्वर
४) नौ + इक   औ + इ = आव् + इ = आवि  नाविक

शनिवार, २० जून, २०१५

धर्मवीर संभाजीराजे sambhajiraje

धर्मवीर संभाजीराजे ! अत्यंत तेजस्वी आणि महापराक्रमी प्रजापालक होते. औरंगजेबाला २७ वर्षे हिंदुस्तानपासून दुर ठेवणार्या संभाजीराजांनी जी अलौकिक कामे त्यांच्या अल्पाआयुष्यात केली. त्याच्या दूरगामी परिणाम संपूर्ण हिंदुस्तानावर झाला. त्यामुळे त्यांच्याविषयी प्रत्येक हिंदू बांधवाने कृतज्ञ असले पाहिजे. त्यांनी औरंगजेबाच्या आठ लाख सैन्याला न डगमगता तोंड दिले आणि कित्येक मोगल सरदारांना लढाईत पराभूत करून पाळता भुई थोडी केली, त्यामुळे औरंगजेब दीर्घकाळ महाराष्ट्रात राहिला आणि संपूर्ण उत्तर हिंदुस्तान त्याच्या दडपणापासून मुक्त राहिला ही संभाजीराजांची सगळ्यात मोठी कामगिरी म्हणावी लागेल. संभाजीराजांच्या संघर्षामुळे  २७ वर्षे औरंगजेब दक्षिणेत अडकून राहिला आणि त्यामुळे उत्तरेस बुंदेलखंड, पंजाब आणि राजस्थान अशा ठिकाणी हिंदूंच्या नवीन सत्ता उदयास येऊन हिंदू समाजाला सुरक्षितता लाभली. संभाजीराजांनी गोव्यावर आक्रमण करून धर्मवेड्या पोर्तुगीजांना नमवले, त्यांचाशी तह करून त्यांना बांधून टाकले . गोव्यातील पोर्तुगिजांचा धर्मप्रसाराला संभाजीराजांनी पायाबंद घातला, त्यामुळे गोवा प्रदेशातील हिंदूंचे रक्षण झाले. १ फेब्रुवारी  १६८९ या दिवशी सख्खा मेहुणा गणोजी शिर्के याच्या फितुरीमुळे संगमेश्वर ठिकाणी संभाजीराजे काही वतनदारांची गार्हाणी ऐकत असतांना पकडले गेले. संभाजीराजांच्या बलिदानामुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आणि मराठ्यांचा स्वाभिमान पुन्हा जागा झाला ही तीनेशे वर्षांपूर्वीच्या राष्ट्रजीवनातील अतिशय महत्त्वाची बाब ठरली त्यामुळे इतिहासाला कलाटणी मिळाली. १४ मे १६५७ हा संभाजीराजांचा जन्मदिवस त्यांना नमन करूया.

मंगळवार, २४ मार्च, २०१५

संधी, Sandhī

आपण बोलताना एका पाठोपाठ येणाऱ्या काही शब्दांमधील अक्षरे एकामागोमाग उच्चारताना, एकमेकांत मिसळली जातात.
उदाहरणार्थ - या वर्गात विद्यार्थी किती?
या वाक्यात वर्ग + आत तसेच विद्या + अर्थी असे शब्द एकत्र येऊन वर्गात, विद्यार्थी हे शब्द उच्चारले जातात. वर्ग मधल्या अंत्य 'अ' मध्ये 'आत' मधल्या आद्य (पहिला वर्ण) 'आ' मिसळून एकत्रित वर्णोच्चार होतो.
एका पुढे एक येणारे जवळजवळचे वर्ण एकमेकात मिसळून जाण्याच्या या प्रक्रियेला संधी म्हणतात.  एकापाठोपाठ एक आलेले दोन वर्ण एकत्र होण्याच्या प्रकाराला संधी म्हणतात.
संधीचे तीन प्रकार
१) स्वरसंधी : जेव्हा एकापाठोपाठ येणारे दोन स्वर एकत्र मिळतात; तेव्हा त्या संधीला स्वरसंधी असे म्हणतात. (स्वर + वर) उदा. सुर + ईश = सुरेश.
२) व्यंजनसंधी : एकापाठोपाठ येणाऱ्या दोन वर्णांपैकी पहिला वर्ण हा जेव्हा व्यंजन असतो व दुसरा वर्ण हा स्वर किंवा व्यंजन असतो, तेव्हा त्या संधीला व्यंजनसंधी असे म्हणतात. (व्यंजन + स्वर किंवा व्यंजन). उदा. सत् + आचार = सदाचार; उत् + लंघन = उल्लंघन.
३) विसर्गसंधी : एकापाठोपाठ येणाऱ्या दोन वर्णांपैकी पहिला वर्ण हा जेव्हा विसर्ग असतो व दुसरा वर्ण हा स्वर किंवा व्यंजन असतो, तेव्हा त्या संधीला विसर्गसंधी असे म्हणतात. (विसर्ग + स्वर किंवा व्यंजन) उदा. नि: + आधार = निराधार; दु: + काळ = दुष्काळ.

शुक्रवार, २० फेब्रुवारी, २०१५

जिल्ह पुणे माहिती Jil'ha puṇē māhitī

पुणे

जिल्हा व प्रशासकीय विभागाचे मुख्यालय : पुणे

क्षेत्रफळ : 15,642 km2 (6,039 sq mi)

स्थान : अहमदनगर, आग्नेयेस : सोलापुत, दक्षिणेस : सातारा, पश्चिमेस : रायगड, वायव्येस : ठाणे जिल्हा.

तालुके : १५
पुणे शहर, पुरंदर, आंबेगाव, इंदापूर, बारामती, भोर, हवेली, खेड, जुन्नर, शिरूर, दौंड, वेल्हे, मुळशी, मावळ.

विस्तार : पुण्याच्या उत्तर व पूर्वेस

लोकसंख्या २०११ ची : ९,४२६,९५९

नद्या :
भीमा ही मुख्य नदी, इंद्रायणी, घोड, मुळा, मुठा, नीरा या अन्य नद्या

धरणे : वेळवंडीवरील भाटघर धरण, आंबी नदीवरील पानशेत धरण, मोसी नदीवरील वरसगाव धरण

पिके : ऊस, बाजरी, गहू, जुन्नर येथील कांदा.

औद्योग :
बजाज, टेल्को, टेम्पो, किर्लोस्कर नामांकित कंपन्यांचे कारखाने.
तळेगाव येथे काच उद्योग, खडकी - संरक्षण साहित्य निर्मिती कारखाना, मुंढवा येथे कागद गिरणी

शैक्षणिक :
पुणे विद्यापीठ स्थापना: १९४९ (पूर्वेकडील ऑक्सफर्ड)
टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे (स्थापना: १९९५)
श्री शिवछत्रपती क्रीडा विद्यापीठ, पुणे

पर्यटन स्थळे :
आळंदी येथे इंद्रायणीतिरी, खेड तालुक्यात, संत ज्ञानोबारायांनी संजीवन समाधी येथे घेतली.
देहू : हवेली तालुक्यात जगद्गुरू संत तुकोबारायांची जन्मभूमी.
भिमाशंकर : आंबेगाव तालुक्यात भीमा नदीचे उगमस्थान, बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग, थंड हवेचे ठिकाण.
आर्वी : 'विक्रम' हे दळणवळण केंद्र आहे.
जेजुरी : खंडोबा हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत
बारामती : कऱ्हा नदीकाठी द्राक्षांपासून मद्यनिर्मिती प्रकल्प
वढू : छ. संभाजी राजांची समाधी
सासवड : सोपानदेवांची समाधी
उरुळी-कांचन : भारतीय अॅग्रो इंडस्ट्रीज फौंडेशन ही संस्था
अष्टविनायक पैकी पाच गणपती पुणे जिल्हात आहे.
भिमिशंकर येथे अभयारण्य आहे.
(विद्येचे माहेरघर गणला गेलेला पश्चिम महाराष्ट्रातील पुणे एक जिल्हा)