Advertisement

शुक्रवार, ३० एप्रिल, २०२१

Maharashtra Day, महाराष्ट्र दिवस

१ मे महाराष्ट्र दिवस

१ मे रोजी केवळ मजदूर दिवस किंवा मे दिन नव्हे तर महाराष्ट्र दिन देखील साजरा केला जातो. महाराष्ट्र आणि गुजरात ही भारतातील दोन राज्ये, १ मे हा त्यांचा स्थापना दिवस म्हणून साजरा करतात. भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी ही दोन्ही राज्ये मुंबई राज्याचा भाग होती. या दिवशी 'महाराष्ट्र' या राज्याची स्थापना झाली. यापूर्वी महाराष्ट्र व गुजरात यांचे वेगळे अस्तित्व नव्हते. त्या काळी, राज्यात मराठी  व गुजराती भाषा बोलणारे लोक सर्वाधिक होते. मराठी व गुजराती भाषिक लोक स्वत: साठी स्वतंत्र राज्याची मागणी करीत होते. दोन्ही भाषांचे लोक दिवसेंदिवस आपली हालचाल तीव्र करीत होते.

वास्तविक, राज्य पुनर्गठन कायदा १९५६ अंतर्गत बरीच राज्ये स्थापन केली गेली. या कायद्यांतर्गत कर्नाटक राज्य कन्नड भाषिक लोकांसाठी केले गेले, तर तेलगू भाषिकांना आंध्र प्रदेश मिळाला. त्याचप्रमाणे, तामिळनाडूला केरळ आणि तमिळ भाषिक बोलण्यासाठी मल्याळम भाषकांसाठी राज्य बनवले गेले. पण मराठे व गुजरातींना वेगळी राज्ये मिळाली नाहीत. या मागणीवर अनेक आंदोलने झाली.

१ मे १९६० रोजी भारत सरकारच्या तत्कालीन नेहरू सरकारने 'बॉम्बे पुनर्गठन कायदा १९६०' अंतर्गत महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांमध्ये मुंबई राज्य विभागले. दोन्ही राज्यांमध्ये बॉम्बेबाबतही वाद झाला. मराठ्यांनी सांगितले की बॉम्बेने त्यांना भेटायला हवे कारण तेथील बहुतेक लोक मराठी बोलतात, तर गुजराती लोक म्हणतात की ते बॉम्बे म्हणजे काय. अखेरीस मुंबई महाराष्ट्राची राजधानी बनली.

महाराष्ट्र दिन विशेष करण्यासाठी राज्य सरकारतर्फे दरवर्षी १ मे रोजी अनेक रंगीबेरंगी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. हा दिवस खास करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने खास परेड काढली आहे.

रविवार, २६ मार्च, २०१७

Prasang lekhan, varnanatmak nibandha, प्रसंग लेखन (वर्णनात्मक निबंध)

              प्रसंग लेखन (वर्णनात्मक निबंध)

आपण एखादा प्रसंग, एखादे दृश्य, हुबेहुब केलेले लेखन, शब्दचित्र म्हणजेच प्रसंगलेखन होय.
१) लेखन तुमच्या विचाराने, स्वतःच्या शैलीत लिहा.
२) प्रसंगलेखनालाच प्राधान्य हवे आहे.
३) रचना बोधीव आणि मुद्दे एकमेकांशी संबंधित आहेत काय?
४) सुरुवार आकर्षक, औत्सुक्य निर्माण करणारी आहे आणि शेवट इकमेकांशी परस्पर संलग्न आहे काय?
५) भाषा विषयाला साजेल शोभेल काय?
६) समाजातील संदर्भ, मोठ्या व्यक्तींचे विचार, चालू घडामोडीवरील समर्पक उल्लेख त्यात आला आहे का?
७) भाषा सुंदर, अर्थपूर्ण, रचनात्मक, म्हणी वाक्प्रचार यांचा वापर, स्पष्टपणे अर्थ व्यक्त करणारी.

(आपल्या रोजच्या जीवनात काही गोष्टी, घटना, प्रसंग घडतात. एखादी घटना आपल्याला विचार करायला लावतात, समजा असा प्रसंग आपल्याच बाबतीत असा घडला. तर त्यावर आपली प्रतिक्रिया काय असेल? प्रसंगाचे घडलेल्या घटनेचे वर्णन अगदी तटस्थपणे करावयाचे आहे. आपले विचार, भावना, कल्पना आपण शब्दबध्द करू शकतो. आपले विचार, भावना प्रभावीपणे मांडण्याचे कौश्यलही आपल्याला प्राप्त होते.)
 

गुरुवार, २५ ऑगस्ट, २०१६

विरामचिन्हे viramchinhe

विरामचिन्हे
चिन्हाचे नाव मराठी नाव उपयोग
पूर्णविराम . १) वाक्य पूर्ण झाले असता.
२) शब्दांचा संक्षेप दाखविणे.
१) जान्हवी गावाला गेली.
२) पु.ल. (पुरुषोत्तम लक्ष्मण)
अर्धविराम ; दोन छोटी छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययांनी जोडली असता. ढग गर्जत होते; पण पाऊस पडला नाही.
स्वल्पविराम , एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास, लांबोधन प्रसंगी आमच्या घरात लिंबू, आंबे, सफरचंद व मोसंबी आहे.
अपूर्णविराम : एखाद्या बाबींचा तपशील द्यावयाचा असल्यास. सम संख्या पुढीलप्रमाणे आहेत: २, ४, ६, ८, १०, १२
प्रश्नचिन्ह ? प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी त्याचे नाव काय?
उद्गारचिन्ह ! भावना व्यक्त करणाऱ्या शब्दांच्या शेवटी शाबास! छान गातोस.
आहाहा! काय हे दृश्य.
अवतरणचिन्ह
दुहेरी
एकेरी

"
'   '

बोलणार्याच्या तोंडचे शब्द दाखविताना
एखाद्या शब्दावर जोर द्यावयाचा असल्यास

बाबा म्हणाले, "मी उद्या येईन"
नावालाच 'नाम' म्हणतात.
संयोगचिन्ह




१) दोन शब्द जोडताना
२) वाक्याच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास.
विद्यार्थी-भांडार, प्रेम-विवाह
शाळेच्या सर्व कार्यक्रमात सहभागी व्हा.
आपसारण




१) बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास.
२) स्पष्टीकरण द्यावयाचे झाल्यास.

मी तेथे गेलो, पण
हाच तो सोहम ज्याचा प्रथम क्रमांक आला.

मंगळवार, २८ जून, २०१६

प्रयोग Prayog

प्रयोग


कर्ता, कर्म व क्रियापद यांच्यामधील परस्पर संबंध व्यक्त करणाऱ्या रचनेला प्रयोग म्हणतात. कत्योची किंवा कर्माची क्रियापदाशी विशिष्ट प्रकारची जुळणी या रचना निगडित असणे म्हणजे प्रयोग.
१) कर्तरी प्रयोग - जेव्हा वाक्यातील क्रियापद हे कर्त्याच्या लिंग, वचन व पुरुष यांच्याप्रमाणे बदलते, तेव्हा कर्तरी प्रयोग होतो.
२) कर्मणी प्रयोग - जेव्हा वाक्यातील क्रियापद हे कर्माच्या लिंग, वचन व पुरुष यांच्याप्रमाणे बदलते, तेव्हा कर्मणी प्रयोग होते.
३) भावे प्रयोग - जे वाक्यात क्रियापद हे किंवा कर्म यांच्या लिंग, वचन, पुरुषाप्रमाणे न बदलता स्वतंत्र राहते, व नेहमी नपुंसक लिंगी तृतीय पुरुषी एकवचन असते तेव्हा तो भावे प्रयोग आहे.

सोमवार, २७ जून, २०१६

समास Samas, marathi grammar samas

समास

शब्दांच्या एकत्रीकरणास समास म्हणतात.  दोन शब्दांचे एकत्रीकरण करून जोडशब्द तयार करताना या दोन शब्दांतील परस्परसंबंध दर्शविणारे शब्द अथवा प्रत्यय वगळले जातात.
समासाचे ४ प्रकार आहे -
१) अव्ययीभाव समास
२) तत्पुरुष समास
३) कर्मधारय समास
४) व्दिगु समास
दोन किंवा अधिक पदे परस्पर संबंधामुळे एकत्रित करण्यालाच समास म्हणतात.
(सम् + अस्) एकत्र करणे असा समास करताना त्या दोन पदांतील परस्पर संबंध सूचित करणारे प्रत्यय, अव्यये किंवा अन्य शब्द गाळले जातात.


 

गुरुवार, २१ जानेवारी, २०१६

Republic day, प्रजासत्ताक दिन

दरवर्षी जानेवारी महिन्याच्या सव्वीस तारखेला भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. भारतीय सन-उत्सव साजरे करण्यात नेहमी अग्रभागी आहे. वेगवेगळ्या धर्माचे सण आम्ही सारख्याच उत्साहाने साजरे करत आहे. पण सर्व भारतीयांना अभिमान वाटावा असे काही राष्ट्रीय दिनही आम्ही साजरे करतो. भारत एक मोठे लोकशाही राज्य आहे. म्हणजे हे लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी चालवलेले राज्य आहे. हा अधिकार भारताच्या जनतेला घटनेनुसार २६ जानेवारी १९५० साली मिळाला. त्या दिवसापासून भारतात प्रजेची सत्ता सुरू झाली. म्हणून दरवर्षी २६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून पाळला जातो. या समारंभाचा मुख्य कार्यक्रम भारताची राजधानी दिल्ली येथे होतो. या समारंभात भारतातील सर्व घटकराज्ये भाग घेतात. भारताच्या सर्व क्षेत्रांतील वैभवाचे दर्शन घडवणारी भलीमोठी मिरवणूक काढतात. प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात आणि गावागावातून प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. धाडसी मुलांचा आणि विविध क्षेत्रांत कर्तुत्व गाजवणार्र्यांचा या दिवशी सरकारतर्फे गौरव केला जातो.
शाळेतही प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्यासाठी झेंडे-पताका यांनी शाळा सजवली जाते. सर्व विद्यार्थी, अध्यापक, मुख्याध्यापक यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण केले जाते. शाळेतील एन्.सी.सी. व स्काऊटचे विद्यार्थी सुंदर संचालन करतात. शाळेतील वाद्यवृंदावरही राष्ट्रीय गाणी वाजवली जातात. आम्ही सर्वजण राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतो. प्रमुखाध्यापक गुणी विद्याथ्र्यांचे कौतुक करतात. असे राष्ट्रीय दिन साजरे केल्यामुळे प्रत्येकाच्या मनातील राष्ट्रीय भावना, राष्ट्रप्रेम अधिक उजळून निघते. प्रजासत्ताक दिन याला गणतन्त्र दिन, गणराज्य, Republic day असे ही म्हणतात.
संविधान सभेने भारताचे संविधान तयार करण्याचे काम १९४६ साली सुरू केले. संविधान समितीत डॉ. राजेंद्रप्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलम आझाद, सरोजिनी नायडू, जे.बी. कृपलानी, राजकुमारी अमृत कौर, दुर्गावाई देशमुख, हंसाबेन मेहता असे अनेक मान्यवर सदस्य होते. संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी या सभेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समिती नियुक्त केली. स्वतंत्र भारताचे संविधान २६ जानेवारी १९५० रोजी अमलात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे 'भारतीय संविधानाचे शिल्पकार' आहेत. ब्रिटिश साम्राज्यवादाविरुद्ध लढताना स्वातंत्र्य, समता, बंधुता व लोकशाही या मुल्यावरील निष्ठा भारतीयांनी उराशी बाळगल्या होत्या. या मूल्यांच्या पायावरच आपल्या संविधानाची उभारणी झाली आहे. त्याचबरोबर स्वातंत्र्य लढ्यात लढणाऱ्या वीरांचे चीज झाले. या दिवशी देशाने राष्ट्रीय सुट्टी म्हणून जाहीर केली. सन १९५० पासून आतापर्यंत हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.

सोमवार, २२ जून, २०१५

स्वरसंधीचे नियम Swarsandhi niyam

नियम १ : दोन सजातीय स्वर एकापुढे एक आले असता त्यांचा संधी होऊन त्या दोहोंबद्दल त्याच जातीतील दीर्घ स्वर होतो.
१) सूर्य + अस्त       अ + अ = आ    सूर्यास्त
२) हिम + आलय     अ + आ = आ    हिमालय
३) विद्या + अर्थी      आ + अ = आ    विद्यार्थी
४) विद्या + आलय    आ + आ = आ    विद्यालय                                                                                   
५) कवी + इच्छा     इ + इ = ई       कवीच्छा
६) गिरी + ईश       इ + ई = ई       गिरीश
७) रावी + इंद्र       ई + इ = ई       रवींद्र
८) मही + ईश       ई+ ई  = ई       महीश
९) गुरू+ उपदेश      उ +उ =  ऊ       गुरुपदेश
१०) भू + उद्धार      ऊ + उ = ऊ       भूद्दार

नियम २ : अ किंवा आ यांच्यापुढे इ किंवा ई आल्यास त्या  दोहोंऐवजी 'ए' येतो.
१) ईश्वर + इच्छा अ + इ = ए  ईश्वरेच्छा
२) गण + ईश   अ + ई = ए गणेश
३) महा + इंद्र   आ + इ = ए महेंद्र
४) रमा + ईश   आ + ई = ए रमेश

नियम ३ : अ किंवा आ यांच्यापुढे उ किवा ऊ आल्यास त्या दोहोंऐवजी 'ओ' येतो.
१) सूर्य + उदय   अ + उ = ओ    सूर्योदय
२) समुद्र + ऊर्मी  अ + ऊ = ओ   समुद्रोमी
३) गंगा + उदक  आ + उ = ओ   गंगोदक
४) गंगा + ऊर्मी  आ + ऊ = ओ   गंगोर्मी

नियम ४ : अ किंवा आ यांच्यापुढे ए किंवा ऐ आल्यास त्या दोहोंऐवजी 'ऐ' होतो.
१) एक + एक     अ + ए  = ऐ   एकैक
२) मत + ऐक्या   अ + ऐ  =  ऐ  मतैक्य
३) सदा + एव    आ + ए  = ऐ   सदैव
४) प्रजा + ऐक्य   आ + ऐ =  ऐ  प्रजैक्य

नियम ५ : अ किंवा आ यांच्यापुढे ओ किंवा औ आल्यास त्या दोहोंऐवजी 'औ' येतो.
१) जल + ओघ      अ + ओ = औ  जलौघ
२) वृक्ष + औदार्य    अ + औ = औ  वृक्षौदर्य
३) गंगा + ओघ     आ + ओ = औ  गंगौघ
४) महा + औदार्य   आ + औ = औ  महौदार्य

नियम ६ : अ किंवा आ यांच्यापुढे ऋ आल्यास त्या दोहोंऐवजी 'अर्' येतो.
१) देव + ऋषी   अ + ऋ = अर्  देवर्षी
२) महा + ऋषी  अ + ऋ = अर्  महर्षी

नियम ७ : इ, उ, ऋ या ह्रस किंवा दीर्घ स्वरांपुढे कोणताही विजातीय स्वर आल्यास 'त' च्या जागी अनुक्रमे य्, व् र् हे येतात आणि त्यांत पुढील स्वर मिळतो.
१) प्रीति + अर्थ    इ + अ  = य् + अ  = य    प्रीत्यर्थ 
२) अति + उत्तम    इ + उ = य् + उ = यु    अत्त्युतम
३) किती + एक    ई + ए = य् + ए = ये    कित्येक
४) सु + अल्प     उ + अ = व् +अ = व    स्वल्प
५) मनु + अंतर    उ + अ = व् + अ = व    मन्वंतर
६) भानू + ईश्वर    ऊ + ई = व् + ई = वी   भान्वीश्वर
७) पितृ + आज्ञा   ऋ + आ = र् + आ = रा    पित्राज्ञा

नियम ८ : ए, ऐ, ओ, औ यांच्यापुढे कोणताही स्वर आल्यास त्यांच्या जागी अनुक्रमे आय्, अव्, आव् हे येतात आणि त्यांत पुढील स्वर मिळतो.
१) ने + अन    ए + अ = अय्  +अ = अय   नयन
२) गै + अन    ऐ + अ = आय् + अ = आय  गायन
३) गो + ईश्वर  ओ + ई = अव् + ई = अवी   गावीश्वर
४) नौ + इक   औ + इ = आव् + इ = आवि  नाविक

शनिवार, २० जून, २०१५

धर्मवीर संभाजीराजे sambhajiraje

धर्मवीर संभाजीराजे ! अत्यंत तेजस्वी आणि महापराक्रमी प्रजापालक होते. औरंगजेबाला २७ वर्षे हिंदुस्तानपासून दुर ठेवणार्या संभाजीराजांनी जी अलौकिक कामे त्यांच्या अल्पाआयुष्यात केली. त्याच्या दूरगामी परिणाम संपूर्ण हिंदुस्तानावर झाला. त्यामुळे त्यांच्याविषयी प्रत्येक हिंदू बांधवाने कृतज्ञ असले पाहिजे. त्यांनी औरंगजेबाच्या आठ लाख सैन्याला न डगमगता तोंड दिले आणि कित्येक मोगल सरदारांना लढाईत पराभूत करून पाळता भुई थोडी केली, त्यामुळे औरंगजेब दीर्घकाळ महाराष्ट्रात राहिला आणि संपूर्ण उत्तर हिंदुस्तान त्याच्या दडपणापासून मुक्त राहिला ही संभाजीराजांची सगळ्यात मोठी कामगिरी म्हणावी लागेल. संभाजीराजांच्या संघर्षामुळे  २७ वर्षे औरंगजेब दक्षिणेत अडकून राहिला आणि त्यामुळे उत्तरेस बुंदेलखंड, पंजाब आणि राजस्थान अशा ठिकाणी हिंदूंच्या नवीन सत्ता उदयास येऊन हिंदू समाजाला सुरक्षितता लाभली. संभाजीराजांनी गोव्यावर आक्रमण करून धर्मवेड्या पोर्तुगीजांना नमवले, त्यांचाशी तह करून त्यांना बांधून टाकले . गोव्यातील पोर्तुगिजांचा धर्मप्रसाराला संभाजीराजांनी पायाबंद घातला, त्यामुळे गोवा प्रदेशातील हिंदूंचे रक्षण झाले. १ फेब्रुवारी  १६८९ या दिवशी सख्खा मेहुणा गणोजी शिर्के याच्या फितुरीमुळे संगमेश्वर ठिकाणी संभाजीराजे काही वतनदारांची गार्हाणी ऐकत असतांना पकडले गेले. संभाजीराजांच्या बलिदानामुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आणि मराठ्यांचा स्वाभिमान पुन्हा जागा झाला ही तीनेशे वर्षांपूर्वीच्या राष्ट्रजीवनातील अतिशय महत्त्वाची बाब ठरली त्यामुळे इतिहासाला कलाटणी मिळाली. १४ मे १६५७ हा संभाजीराजांचा जन्मदिवस त्यांना नमन करूया.

मंगळवार, २४ मार्च, २०१५

संधी, Sandhī

आपण बोलताना एका पाठोपाठ येणाऱ्या काही शब्दांमधील अक्षरे एकामागोमाग उच्चारताना, एकमेकांत मिसळली जातात.
उदाहरणार्थ - या वर्गात विद्यार्थी किती?
या वाक्यात वर्ग + आत तसेच विद्या + अर्थी असे शब्द एकत्र येऊन वर्गात, विद्यार्थी हे शब्द उच्चारले जातात. वर्ग मधल्या अंत्य 'अ' मध्ये 'आत' मधल्या आद्य (पहिला वर्ण) 'आ' मिसळून एकत्रित वर्णोच्चार होतो.
एका पुढे एक येणारे जवळजवळचे वर्ण एकमेकात मिसळून जाण्याच्या या प्रक्रियेला संधी म्हणतात.  एकापाठोपाठ एक आलेले दोन वर्ण एकत्र होण्याच्या प्रकाराला संधी म्हणतात.
संधीचे तीन प्रकार
१) स्वरसंधी : जेव्हा एकापाठोपाठ येणारे दोन स्वर एकत्र मिळतात; तेव्हा त्या संधीला स्वरसंधी असे म्हणतात. (स्वर + वर) उदा. सुर + ईश = सुरेश.
२) व्यंजनसंधी : एकापाठोपाठ येणाऱ्या दोन वर्णांपैकी पहिला वर्ण हा जेव्हा व्यंजन असतो व दुसरा वर्ण हा स्वर किंवा व्यंजन असतो, तेव्हा त्या संधीला व्यंजनसंधी असे म्हणतात. (व्यंजन + स्वर किंवा व्यंजन). उदा. सत् + आचार = सदाचार; उत् + लंघन = उल्लंघन.
३) विसर्गसंधी : एकापाठोपाठ येणाऱ्या दोन वर्णांपैकी पहिला वर्ण हा जेव्हा विसर्ग असतो व दुसरा वर्ण हा स्वर किंवा व्यंजन असतो, तेव्हा त्या संधीला विसर्गसंधी असे म्हणतात. (विसर्ग + स्वर किंवा व्यंजन) उदा. नि: + आधार = निराधार; दु: + काळ = दुष्काळ.

शुक्रवार, २० फेब्रुवारी, २०१५

जिल्ह पुणे माहिती Jil'ha puṇē māhitī

पुणे

जिल्हा व प्रशासकीय विभागाचे मुख्यालय : पुणे

क्षेत्रफळ : 15,642 km2 (6,039 sq mi)

स्थान : अहमदनगर, आग्नेयेस : सोलापुत, दक्षिणेस : सातारा, पश्चिमेस : रायगड, वायव्येस : ठाणे जिल्हा.

तालुके : १५
पुणे शहर, पुरंदर, आंबेगाव, इंदापूर, बारामती, भोर, हवेली, खेड, जुन्नर, शिरूर, दौंड, वेल्हे, मुळशी, मावळ.

विस्तार : पुण्याच्या उत्तर व पूर्वेस

लोकसंख्या २०११ ची : ९,४२६,९५९

नद्या :
भीमा ही मुख्य नदी, इंद्रायणी, घोड, मुळा, मुठा, नीरा या अन्य नद्या

धरणे : वेळवंडीवरील भाटघर धरण, आंबी नदीवरील पानशेत धरण, मोसी नदीवरील वरसगाव धरण

पिके : ऊस, बाजरी, गहू, जुन्नर येथील कांदा.

औद्योग :
बजाज, टेल्को, टेम्पो, किर्लोस्कर नामांकित कंपन्यांचे कारखाने.
तळेगाव येथे काच उद्योग, खडकी - संरक्षण साहित्य निर्मिती कारखाना, मुंढवा येथे कागद गिरणी

शैक्षणिक :
पुणे विद्यापीठ स्थापना: १९४९ (पूर्वेकडील ऑक्सफर्ड)
टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे (स्थापना: १९९५)
श्री शिवछत्रपती क्रीडा विद्यापीठ, पुणे

पर्यटन स्थळे :
आळंदी येथे इंद्रायणीतिरी, खेड तालुक्यात, संत ज्ञानोबारायांनी संजीवन समाधी येथे घेतली.
देहू : हवेली तालुक्यात जगद्गुरू संत तुकोबारायांची जन्मभूमी.
भिमाशंकर : आंबेगाव तालुक्यात भीमा नदीचे उगमस्थान, बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग, थंड हवेचे ठिकाण.
आर्वी : 'विक्रम' हे दळणवळण केंद्र आहे.
जेजुरी : खंडोबा हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत
बारामती : कऱ्हा नदीकाठी द्राक्षांपासून मद्यनिर्मिती प्रकल्प
वढू : छ. संभाजी राजांची समाधी
सासवड : सोपानदेवांची समाधी
उरुळी-कांचन : भारतीय अॅग्रो इंडस्ट्रीज फौंडेशन ही संस्था
अष्टविनायक पैकी पाच गणपती पुणे जिल्हात आहे.
भिमिशंकर येथे अभयारण्य आहे.
(विद्येचे माहेरघर गणला गेलेला पश्चिम महाराष्ट्रातील पुणे एक जिल्हा)

रविवार, १५ फेब्रुवारी, २०१५

ल.सा.वि. l.sa.vi. Laghutama sāmā'īka vibhājya

लघुतम सामाईक विभाज्य

- ल.सा.वि. म्हणजे लघुतम सामाईक विभाज्य किंवा लहानात लहान सामाईक विभाज्य.

- विभाज्य म्हणजे ज्याला पूर्ण भाग जातो; बाकी उरत नाही असा भाज्य. उदा. ४५० / ९ = ५० (divide)
या उदा. ४५० हा भाज्य, त्याला ९ ने पूर्ण भाग गेला; बाकी उरली नाही; म्हणून ४५० हा ९ चा विभाज्य आहे.

- सामाईक विभाज्य म्हणजे दोन किंवा अधिक संख्यांचा सामाईक असणारा विभाज्य. उदा. ४५ / ५ = ९ आणि
४५ / ९ = ५ म्हणून ४५ हा ५ आणि ९ चा सामाईक विभाज्य आहे.
१२ चे विभाज्य = १२, २४, ३६, ४८, ६०, ७२, ८४, ९६, १०८......
१६ चे विभाज्य = १६, ३२, ४८, ६४, ८०, ९६, ११२, १२८, १४४,.......
वरीलपैकी १२ आणि १६ यांचा सर्वांत लहान विभाज्य ४८ आहे.

- १२ आणि १६ चा ल.सा.वि. अवयव पद्धतीने पुढीलप्रमाणे काढता येईल-
१२ = २ x २ x ३
१६ = २ x २ x २ x २
ल.सा.वि. = सामाईक अवयव x असामाईक अवयव
(२ x २) x (२ x २ x ३) = ४८

बुधवार, ११ फेब्रुवारी, २०१५

विभक्ती (vibhakti)

नाम, सर्वनाम किंवा तत्सम विकारी शब्द यांचे वाक्यातील क्रीयापादशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात. त्यांना विभक्ती म्हणतात.
वाक्यातील एकमेकांशी असलेले संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात, त्या विकारांना विभक्ती म्हणतात.
शब्दांना जी अक्षरे जोडली जातात, त्यांना विभक्तीचे प्रत्यय म्हणतात.
जी काही क्रिया घडलेली असते, ती सांगितलेली असते. म्हणून वाक्यातील क्रियापद सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुख्यपद मानले जाते. त्या मानाने इतर पदे

असतात. यावरून विभक्ती व विभक्तीचे अर्थ याबद्दल साधारणपणे असे म्हणतात.

विभक्त्यार्थ दोन प्रकार
१) कारकार्थ - कारक व कारकार्थ
२) उपपदार्थ - कर्ता, करण, कर्म

विभक्तीची आठ नावे
१) प्रथमा (The first)      २) द्वितीया (accusative)   ३) तृतीया (blocks)    ४) चतुर्थी  (chaturthi)   ५) पंचमी (panchami)    ६) षष्ठी (genitive)   ७) सप्तमी  (Sapthami) ८)  संबोधन (Speaking)
विभक्तीतीचे प्रत्यय - नी, ट, चा
विभक्ती  -  (एकवचन)  -  (अनेकवचन)

१) प्रथमा  -  प्रत्यय नाही  -  प्रत्यय नाही      
२) द्वितीया  -  स, ला, ते  -  स, ला, ना, ते   
३) तृतीया  -  ने, ए, शी  -  नी, शी, ही    
४) चतुर्थी  -  स, ला, ते  -  स, ला, ना, ते    
५) पंचमी  -  ऊन, हून  -  ऊन, हून    
६) षष्ठी  -  चा, ची, चे  -  चे, च्या, ची  
७) सप्तमी  -  त, ई, आ  -  त, ई, आ  
८) संबोधन  -  प्रत्यय नाही  -  नो

विभक्तीतील रूपे
विभक्ती  -  (एकवचन)  -  (अनेकवचन)
१) प्रथमा -  फूल  -  फुले
२) द्वितीया  -  फुला, दुलाला  -  फुलां, फुलांना
३) तृतीया  -  फुलाने, फुलाशी  -  फुलांनी, फुलांशी
४) चतुर्थी  -  फुला, फुलाला  -  फुलां, फुलांना
५) पंचमी  -  फुलातून, फुलाहून  -  फुलांतून, फुलांहून
६) षष्ठी  -  फुलाचा, फुलाची, फुलाचे  -  फुलांचा, फुलांची, फुलांचे
७) सप्तमी  -  फुला  -  फुलां
८) संबोधन  -  फुला  -  फुलांनी

मंगळवार, २७ जानेवारी, २०१५

शब्दयोगी अव्यय Śabdayōgī avyaya

"जो शब्द वाक्यातील एखाद्या शब्दाला जोडून येतो व ज्या शब्दाला तो जोडून येतो; त्या शब्दाचा त्याच वाक्यातील दुसऱ्या एखाद्या शब्दाशी संबंध दर्शवतो,

त्या अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय म्हणतात."

जी अव्यये नाम, सर्वनाम किंवा तत्सम शब्द यांना जोडून येतात आणि त्यांचा (वाक्यातील) इतर शब्दांशी संबंध दर्शवितात त्यांना शब्दयोगी अव्यय म्हणतात.

योग म्हणजे जोड, जुळणी, शब्दयोगी म्हणजे शब्दाला जोडून आलेले.

उदा., 'घरावर कैले टाकूया' या वाक्यातील 'वर' हा शब्द.
तो शब्द 'घर' या मूळ शब्दाला जोडून आला आहे व त्यामुळे 'घर' या शब्दाचा 'टाकूया' या शब्दाशी संबंध जोडला गेला आहे.

- नाम सर्वनामांप्रमानेच कधी कधी क्रियापदे व क्रियाविशेषणे यांनाही जोडून शब्दयोगी अव्यये येतात.
उदा.
गाणे (क्रियापद) - गाण्यासाठी
इथे (क्रियाविशेषण) - इथपासून
तिथे (क्रियाविशेषण) - तिथपर्यंत
जाईपर्यंत, आल्यावर, बोलण्यापेक्षा (क्रियापदांना जोडून शब्दयोगी अव्यये)
कालपासून उद्यापर्यंत, कधीही, मुळीच, जरासुद्धा (अव्ययांना जोडून शब्दयोगी अव्यये)

मंगळवार, २ डिसेंबर, २०१४

प्रयोजक क्रियापदे prayojak kriyapade

मूळ धातूच्या क्रियेचा कर्ता, ती क्रिया स्वतः करीत नसून, ती क्रिया तो दुसऱ्या कोणाला तरी करावयास लावीत आहे, असा अर्थ व्यक्त होत असेल तर त्या क्रियापदाला 'प्रयोजक क्रियापद' असे म्हणतात.

साधित धातूवरून दोन प्रकारची क्रियापदे बनतात - 
१) प्रयोजक क्रियापदे   २) शक्य क्रियापदे

वाक्ये -
१) ते मूल हसते.    २) आई त्या मुलाला हसविले.

पहिल्या वाक्यात 'हसते' क्रियापद आहे; तर दुसऱ्या वाक्यात 'हसविते' क्रियापद आहे. दोन्ही क्रियापदांतील मूळ धातू 'हस' हाच आहे. हसण्याची क्रिया दोन्ही वाक्यांत मुलाकडूनच होते. पहिल्या वाक्यात हसण्याची क्रिया मुलाकडून स्वाभाविकापणे किंवा आपणहून केली गेली, पण दुसऱ्या वाक्यात 'हसविते' या शब्दाने आईने ती त्याला करवला लावली असा अर्थ व्यक्त होतो.   

शनिवार, २९ नोव्हेंबर, २०१४

उभयविध क्रियापदे ubhayavidha verb

एकाच क्रियापद दोन वेगळ्या वाक्यांत सकर्मक (transitive) व अकर्मक (intransitive) असे दोन्ही तऱ्हेनी वापरता येते; अशा क्रियापदांना 'उभयविध क्रियापदे' असे म्हणतात.
वाक्ये पहा -
१) अ) त्याने घराचे दार उघडले.     ब) त्याच्या घराचे दार उघडले.
२) अ) रामाने धनुष्य मोडले.        ब) ते लाकडी धनुष्य मोडले.

१) गटातील दोन्ही वाक्यांत 'उघडले' हे क्रियापद आहे. पहिल्या वाक्यात ते सकर्मक वापरले आहे. या वाक्यात 'त्याने' कर्ता असून 'दार' हे कर्म आहे. 'उघडले' क्रियापद सकर्मक आहे.
दुसऱ्या वाक्यात 'उघडले' हेच क्रियापद आहे. इथे 'उघडणारे कोण' या प्रश्नाचे उत्तर 'दार' येते. तर 'उघडण्याची क्रिया कोणावर घडली?' या प्रश्नाचे उत्तरही 'दार' येते. याचा अर्थ 'उघडले' क्रियापद इथे 'अकर्मक' आहे.

२) गटातील वाक्यांत 'मोडले' हे क्रियापद आहे. त्यापैकी पहिल्या वाक्यात 'मोडले' हे क्रियापद सकर्मक आहे, तर दुसऱ्या वाक्यात ते अकर्मक आहे.
यावरून असे दिसते की, एकाच क्रियापद दोन वेगळ्या वाक्यांत सकर्मक व अकर्मक असे दोन्ही तऱ्हांनी वापरता येते; अशा क्रियापदांना 'उभयविध क्रियापदे' असे म्हणतात. काप, आठव, स्मर, लोट हे धातू या प्रकारचे होत.


बुधवार, २६ नोव्हेंबर, २०१४

विधीविशेषण Vidhīviśēṣaṇa vidhivisesana

विशेषण हे सामान्यतः विशेष्याच्या पूर्वी असते. जसे - 'चांगला मुलगा सर्वांना आवडतो.' इथे चांगला हे अधिविशेषण किंवा पूर्वविशेषण होय. पण कधी - कधी विशेषण विशेष्याच्या नंतर येऊन विधेयात विशेष्याबद्दलचे विधान पूर्ण करते. जसे 'तो मुलगा आहे चांगला.' अशा विशेषणाला विधीविशेषण किंवा उत्तरविशेषण 'तो मुलगा आहे चांगला.' अशा विशेषणाला विधीविशेषण किंवा उत्तरविशेषण (uttaravisesana)
असे म्हणतात. पुढील वाक्य पहा -
१) मुलगा हुशार आहे.
२) गणेशचे अक्षर सुंदर आहे.
३) आजची पूजा चांगली झाली.

वरील वाक्यांतील 'हुशार' हे विशेषण 'मुलगा' या नामाबद्दल अधिक माहिती देते व ते नामानंतर आले आहे. 'सुंदर' हे विशेषण 'अक्षर' या नामाबद्दल अधिक माहिती सांगते व नामानंतर आले आहे. 'चांगली' हे विशेषण 'पूजा' या नामाबद्दल अधिक माहिती सांगते व ते नामानंतर आले आहे. 'हुशार, सुंदर, चांगले' ही विधिविशेषणे आहे.

नामापूर्वी येणाऱ्या विशेषणाला अधिविशेषण म्हणतात, तर नामानंतर येणाऱ्या विशेषणाला विधिविशेषण असे म्हणतात.

सोमवार, २४ नोव्हेंबर, २०१४

क्रियाविशेषण अव्यय (Kriyāviśēṣaṇa avyaya)

(क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय म्हणतात)

अधोरेखित शब्द पहा
१) राजेश चालतो.
२) राजेश हळूहळू चालतो.

दुसऱ्या वाक्यात 'हळूहळू' या शब्दाने राजेश कसा चालतो, हे सांगितले आहे. 'हळूहळू' या शब्दाने 'चालतो' क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगितली आहे.

'हळूहळू' हे 'चालतो' या क्रियापदाचे विशेषण आहे. यालाच क्रियाविशेषण म्हणतात; म्हणून 'हळूहळू' हे क्रियाविशेषण आहे. क्रियाविशेषण हे अविकारी असल्यामुळे त्याला अव्यय म्हणतात.

वाक्ये वाचा व समजून घ्या :

१) ससा तुरुतुरु पळतो. (कसा पळतो? - तुरुतुरु)
२) आई काल गावाला गेली. (कधी गेली? - काल)
३) येथे वह्या - पुस्तके मिळतात. (कोठे मिळतात? - येथे)
४) दिवसातून दोनदा जेवावे. (किती वेळा जेवावे? - दोनदा)

'कसा, कधी, कोठे, किती' हे प्रश्न क्रियापदाला विचारले की जी उत्तरे येतात, ती क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणारी असतात. वरील वाक्यांतील 'तुरुतुरु, काल, येथे, दोनदा' हे शब्द त्या त्या वाक्यांतील क्रियापदांबद्दल विशेष माहिती सांगतात.

क्रियाविशेषणे वाचा -

अलीकडे
लगेच
खुलून
खूप
एकदम
पटापट
संथ
जवळ
सतत
सावकाश
जिकडेतिकडे
काळ
ताबडतोब
आकर्षक
टकमका
संध्याकाळी

बुधवार, १९ नोव्हेंबर, २०१४

मराठी क्रियापदांचे प्रकार marathi kriyapadache prakar

क्रियापदांचे प्रकारक्रियापदांचे तीन प्रकार आहेत.
१) सकर्मक क्रियापद    २) अकर्मक क्रियापद    ३) संयुक्त क्रियापद


१) सकर्मक क्रियापद
वाक्यातील क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास जेव्हा कर्माची जरुरी लागते; त्याला सकर्मक क्रियापद म्हणतात; म्हणून 'करतो' हे सकर्मक क्रियापद आहे.
खालील वाक्य पहा
- राजेश अभ्यास करतो.
वरील वाक्यात करतो हे क्रियापद आहे.
करण्याची क्रिया करणारा राजेश; म्हणून राजेश हा कर्ता आहे.
करण्याची क्रिया अभ्यासावर घडते; म्हणून अभ्यास हे कर्म आहे.
म्हणजेच,
राजेश    अभ्यास    करतो.
 ↓            
             
 कर्ता      कर्म       क्रियापद

खालील वाक्य पहा
- राजेश करतो. (येथे कर्म काढून टाकले आहे.)
वरील वाक्याला काहीच अर्थ नाही.
म्हणजेच, वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही.
म्हणजेच, करतो या क्रियापदाला कर्माची जरुरी आहे. सकर्मक म्हणजे कर्मासहित (बरोबर, सह) असते ते.
म्हणून,  राजेश    अभ्यास    करतो.
             
                         
              कर्ता       कर्म        सकर्मक क्रियापद

२) अकर्मक क्रियापद
ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची जरुरी लागत नाही व क्रिया कर्त्याशीच थांबते तेव्हा त्या क्रियापदाला अकर्मक क्रियापद म्हणतात, म्हणून
'पळतो' हे अकर्मक क्रियापद आहे.

खालील वाक्य पहा
राजेश पळतो.
वरील वाक्यात पळतो हे क्रियापद आहे.
पळण्याची क्रिया करणारा राजेश; म्हणून राजेश हा कर्ता आहे.
राजेश      पळतो
 
             
कर्ता       क्रियापदम्हणजेच, या वाक्यात पळण्याची क्रिया कर्ता करतो व ती कर्त्यापाशी थांबते.
म्हणून,
'राजेश पळतो' हे वाक्य पूर्ण अर्थाचे आहे.
पळतो या क्रियापदाला कर्माची जरुरी नाही.

- अकर्मक म्हणजे कर्म नसते ते.
म्हणून,   राजेश     पळतो
               
            
               कर्ता       अकर्मक क्रियापद


३) संयुक्त क्रियापद
धातुसाधित व सहायक क्रियापद मिळून बनणाऱ्या क्रियापदाला संयुक्त क्रियापद म्हणतात; म्हणून 'खेळू लागला' हे संयुक्त क्रियापद आहे.वाक्यातील अधोरेखित शब्दांकडे नीट लक्ष द्या -
आपण दोघे मैदानात खेळू.
खेळू या शब्दात खेळण्याची क्रिया आहे.
खेळू हा क्रियावाचक शद्ब आहे.
खेळू हा शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करतो.
म्हणजेच 'खेळू' हे क्रियापद आहे.

१) राजेश मैदानात खेळू. (वाक्य अर्थपूर्ण नाही)
२) राजेश मैदानात लागला. (वाक्य अर्थपूर्ण नाही)
३) राजेश मैदानात खेळू लागला. (वाक्य अर्थपूर्ण आहे.)

पहिल्या वाक्यात खेळू हा क्रियावाचक शद्ब आहे; पण तो वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही.
दुसऱ्या वाक्यात लागला हा क्रियावाचक शब्द आहे; पण तो वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही.
तिसऱ्या वाक्यात खेळूलागला हे दोन क्रियावाचक शब्द एकत्र आल्याने ते वाक्याचा अर्थ पूर्ण करतात.

म्हणजेच 'खेळू लागला' या दोन शब्दांनी मिळून वाक्याचा अर्थ पूर्ण होतो.
इथे खेळू हा शब्द 'खेळ' या धातूपासून बनलेला असल्यामुळे तो शब्द धातुसाधित किंवा कृदन्त आहे, तर लागला या क्रियावाचक शब्दाने खेळण्याची क्रिया पूर्ण करण्यासाठी मदत किंवा साहाय्य केले आहे; म्हणून 'लागला' हे सहायक क्रियापद आहे.

म्हणून 'खेळू लागला' हे क्रियापद धातुसाधित (कृदन्त)सहायक क्रियापद यांनी मिळून बनले आहे.
खेळू     +   लागला = खेळू लागला.
(धातुसाधित / कृदन्त) + (सहायक क्रियापद) = संयुक्त क्रियापद.

संयुक्त क्रियापदे : घेऊन गेली, होऊ शकतो, करून टाक, सांगून ये, वाटत असे, जायला पाहिजे, रंगले होते, पाहता आले.

रविवार, १६ नोव्हेंबर, २०१४

आचार्य डॉ. प्रफुल्लचंद्र रे (aachary dr prafullachandra re)

भारताचे महान रसायनशास्त्रज्ञ आणि वैज्ञानिक आचार्य डॉ. प्रफुल्लचंद्र रे यांचा जन्म २ ऑगस्ट, १८६१ रोजी तत्कालीन पूर्व बंगालमधील (सध्याच्या बांग्लादेशमधील) रादौली काठीपाढा (kathipadha) या गावात एका समृध्द व सुसंस्कृत कुटुंबात झाला. त्यांचे वडील हरिश बाबू हे बंगालमधील पाश्चात्त्य शिक्षणाच्या प्रवर्तकांपैकी एक होते. त्यांनी मॉडेल इंग्रजी शाळेची (Modal english school) स्थापना केली. त्या वेळेचे समाजसुधारक जतींद्र मोहन ठाकूर, ईश्वरचंद्र विद्यासागर
विज्ञानाचा अभ्यास केल्यानंतर इ.स. १८८२ मध्ये रे यांनी इंग्लंडला जाऊन, एडिनबरो विद्यापीठात प्रवेश घेतला. तेथे प्रसिध्द रसायनशास्त्रज्ञ अलेक्झांदर ब्राडन यांच्या संपर्कात ते आले. त्यामुळे रसायनशास्त्रातील त्यांना असणारी आवड अधिकच वाढली. तेथे ते डॉक्टर गिब्सन, डॉक्टर डोबीन आणि अन्य प्रसिद्ध विद्यानांच्या संपर्कात आले. त्यांनी जर्मन भाषा आणि जर्मन वैज्ञानिकांच्या ग्रंथांचा अभ्यास केला. भारतातील तत्कालीन प्रसिध्द वैज्ञानिक जगदीशचंद्र बोस यांचीही त्यांनी भेट घेतली. ते दोघे एकमेकांचे चांगले मित्र झाले. इ.स. १८८५ मध्ये एडिनबरो विद्यापीठातून बी.एस्सी. पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी मूळ धातूंच्या विश्लेषणासाठी संशोधन कार्य सुरू केले. इ.स. १८८७ मध्ये डी. एस्सी. ही पदवी प्राप्त केली. एडिनबरो विद्यापीठात त्यांनी काही पुरस्कार आणि काही शिष्यवृत्याही मिळवल्या. इ.स. १८८८ मध्ये विद्यापीठाच्या 'केमिकल्स सोसायटी' चे उपाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. या देदीप्यमान यशप्राप्तीनंतर इ.स. १८८८ मध्ये कलकत्ता येथे ते परत आले. त्यांनी रु. २५० प्रतिमाह पगारावर सहाय्यक प्राध्यापक म्हणून तेथील प्रेसिडेन्सी महाविद्यालयात नोकरीस प्रारंभ केला.
महाविद्यालयातील अध्यापन कामाव्यतिरिक्त निरनिराळ्या नायट्रेटस्वर (nayatretas on) त्यांनी संशोधन सुरू केले. त्यांचे राहणीमान अतिशय साधे होते. पाश्चात्त्य पेहरावाचा त्याग करून त्यांनी भारतीय वेशभूषा (सदरा व लेंगा) स्वीकारली होती. जी काही बचत त्यांना शक्य होती, ती ते विज्ञानविषयक कामावर आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी खर्च करत. आपल्या घरातच त्यांनी एक लहानशी प्रयोगशाळा बनवली होती. इ.स. १८९५ मध्ये त्यांनी संशोधन केलेल्या 'मर्क्युरिक नायट्रेट' या अत्यंत महत्त्वाच्या पहिल्या संशोशानाची घोषणा करण्यात आली. त्यांच्या या संशोधनाने रसायनशास्त्रात संशोधन करणाऱ्या जगातील सर्व विज्ञानिकांचे लक्ष वेधून घेतले. भारताच्या गरिबीमुळे नेहमी चिंतित असणाऱ्या प्रफुल्लचंद्रांचा असा ठाम विश्वास होता की, रासायनिक आणि औषध उद्योगांची स्थापना केल्याने केवळ चांगले रोजगार निर्माण होतील असे नाही; तर या क्षेत्रात आपला देश स्वयंपूर्णही बनेल. याशिवाय अशा प्रयत्रामुळे औषधांच्या अभावी प्राणघातक ठरणाऱ्या रोगांपासून अनेक रोग्यांचे जीवन देखील वाचू शकेल.
बेरोजगार पदवीधर विज्ञान स्नातकांसाठी लहान-मोठे उद्योग स्थापन करण्याची त्यांची इच्छा होती. इ.स. १९०१ मध्ये चिनी मातीची भांडी बनविणाऱ्या 'कलकत्ता पॉटरी वर्स्क' ची स्थापना करण्यात त्यांनी मदत केली. याशिवाय त्यांनी 'बंगाल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल वर्क्स लि.' ची स्थापना केली.
यासाठी त्यांनी एका ट्रस्टची स्थापनाही केली. देशासाठी आणि विशेषकरून बंगालसाठी ही संस्था एक वरदान ठरली. सुरुवातीला प्रेसिडेन्सी महाविद्यालयातील रसायनशास्त्र पदवीधरांना व त्यांच्यासारख्या इतर विद्यार्थांना रोजगार प्राप्त करण्यासाठी आणि स्वयंपूर्ण बनण्यासाठी मदत केली. त्यांचा दुसरा शोध अमोनिअम नायट्रेट हा होता. नायट्राइटमधील यशस्वी संशोधनासाठी प्राध्यापक आर्मस्ट्राँग यांनी 'मास्टर ऑफ नायट्राइट' ही पदवी त्यांना दिली. नायट्राइटमधील त्यांच्या संशोधनाने जगाचे लक्ष वेधले. या प्रभावी यशाने प्रेरित होऊन इ.स. १९०४ मध्ये बंगाल सरकारने त्यांना युरोपियन देशांमधील विविध प्रयोगशाळांना भेट देण्यासाठी पाठवले. या शैक्षणिक दैऱ्याच्या काळात त्यांनी आपल्या शोधांच्या संदर्भात व्याख्यानेही दिली. याशिवाय इ.स. १९०२ मध्ये प्रकाशित झालेले त्यांचे पुस्तक 'इंडियन केमिकल हिस्टरी' जगभरात चर्चेचा विषय ठरले. डरहॅम विद्यापीठच्या कुलपतींनी देखील या पुस्तकाची स्तुती केली. डॉ. रे यांनी १३ व १४ व्या शतकांत भारतीय रसायनशास्त्रज्ञांनी केलेल्या कार्याबद्दल विस्ताराने लिखाण केले आहे. या पुस्तकात त्यांनी भारतीय संस्कृतीचे यथार्थ आणि वास्तव चित्रण सादर केले.
इ.स. १९११ साली सरकारने त्यांना 'नाइट  हुड' ही पदवी प्रदान केली. इ.स. १९१२ मध्ये विद्यापीठांच्या प्रथम संमेलनात सहभागी होण्यासाठी कलकत्ता विद्यापीठाचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी दुसऱ्यांदा युरोपचा दौरा केला. त्याच वर्षी डरहॅम विद्यापीठाने त्यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी देऊन सन्मानित केले. इ.स. १९१८ मध्ये व्याख्यान देण्यासाठी मद्रास विद्यापीठाचे (आताचे चेन्नई) निमंत्रण त्यांनी स्वीकारले. विद्यापीठांकडून जे मानधन मिळाले, ते त्यांनी शिष्यवृत्तीच्या रूपात विद्यार्थ्यांना देऊन टाकले. इ.स. १९१७ मध्ये कोलकाता येथे झालेल्या भारतीय सामाजिक संमेलनाच्या अध्यक्षपदी (The chairman of the Indian social gathering) त्यांची नेमणूक झाली. इ.स. १९२० साली झालेल्या भारतीय विज्ञान कॉंग्रेसचे ते सभापती झाले. त्याच वर्षी त्यांना गांधीजींना भेटण्याची संधी मिळाली. गांधीवादी आदर्श आणि खादीप्रधान जीवनशैली यांनी प्रभावित होऊन अहिंसा आंदोलनाचे ते कट्टर समर्थक बनले. खुलना जिल्ह्यात जेव्हा कडकडीत दुष्काळ पडला, तेव्हा सर्व कामे सोडून मदतकार्यात सहभागी होण्यासाठी रे तेथे पोहोचले. त्यांनी रोजगाराचे एक साधन म्हणून गरीब लोकांत चरख्याचा उपयोग लोकप्रिय बनवला. चरख्याचे अर्थशास्त्र नवीन पद्धतीने त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवले.
इ.स. १९२१ मध्ये त्यांनी वयाची ६० वर्षे पूर्ण केली, तेव्हा आपला संपूर्ण पगार विज्ञान व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या विकासासाठी विद्यापीठाला देणगी म्हणून दिला. दरवर्षी मिळणाऱ्या १,३०,२०० रुपयांवर व्याजातून दोन विद्यार्थ्यांना डॉ. पी. सी. रे. शिष्यवृत्ती दिली जाई. इ.स. १९२२ मध्ये त्यांनी अनुक्रमे मायक्रो बायोलॉजी आणि जीवाश्स्त्र या विषयांमधील सर्वोत्तम विद्यार्थ्याला १२,००० रुपयांचा 'नागार्जुन पुरस्कार' आणि ११,००० रुपयांचा 'सर आशुतोष मुकर्जी पुरस्कार' जाहीर केला. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी देणगी देणारे लोक असतात; परंतु, दुसऱ्यांच्या नावाने शिष्यवृत्तीसाठी आपला पैसा देणारे लोक कमी असतात; खरोखरच, असे लोक महान होत.
सर आशुतोष मुकर्जी कलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. नंतर त्यांची नेमणूक कलकत्ता विद्यापीठाचे कुलपती म्हणून करण्यात आली. त्यांनी विद्यापीठामध्ये विज्ञान शिक्षणाच्या प्रगतीसाठी केलेल्या प्रयत्नांचे आणि विज्ञानात केलेल्या योगदानाचे महत्त्व लक्षात घेऊन प्रफुल्लचंद्र रे यांनी त्यांच्या सन्मानार्थ एक शिष्यवृत्ती जाहीर करण्याचा निर्णन घेतला. इ.स. १९२४ मध्ये डॉक्टर पी. सी. रे, जे. एन, मुकर्जी, जे. सी. घोष आणि शांतीस्वरूप भटनागर यांनी 'इंडियन केमिकल सोसायटी' (Indian Chemical Society) ची स्थापना केली. संस्थेच्या खर्चासाठी १२,००० रु. चे सुरुवातीचे योगदान रे यांनी दिले. या संस्थेचे ते दोन वर्षे अध्यक्ष होते.
इ.स. १९३२ मध्ये 'एका बंगाली रसायनतज्ज्ञाचे जीवनचरित्र व त्यांचे अनुभव' (द लाइफ-स्केच अँड एक्सपीरियन्सेस ऑफ अ बंगाली केमिस्ट) या शीर्षकाचे आत्मचरित्र त्यांनी लिहिले. इ.स. १९३४ मध्ये लंडन केमिकल सोसायटीने त्यांना सन्माननीय सदस्यत्व प्रदान केले. इ.स. १९३६ साली 'रसायनशास्त्राचे वयोवृद्ध प्राध्यापक' म्हणून ते विद्यापीठातून निवृत्त झाले. त्यांच्या सेवाकाळाची स्तुती करत विद्यापीठाने त्यांची तहहयात सन्माननीय विद्वान प्राध्यापक म्हणून नियुक्ती केली. ते मुलत: संत स्वभावाचे प्राध्यापक होते. शिवाय ते अतिशय मृदुभाषी (Soft spoken) आणि दयाळू (clement) होते. १४ जून, १९४४ रोजी या वैज्ञानिकाचे विद्यापीठाच्या वास्तूतच निधन झाले. रवींद्रनाथ टागोरांवर ज्या ठिकाणी अंतिम संस्कार केले गेले होते, त्या स्थानाच्या जवळच या महान वैज्ञानिकावर अंतिम संस्कार करण्यात आले. आपण या बहुआयामी व्यक्तीमत्त्व असणाऱ्या आणि देशासाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या थोर पुरुषाला श्रद्धांजली वाहू या.
आदींशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. नाजूक प्रकुतीचे असले तरी, प्रफुल्लचंद्र अतिशय बुद्धिमान व प्रतिभाशाली होते. जन्मगावी प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर इ.स. १८७० साली कलकत्ता येथील हैयर स्कूलमध्ये ते दाखल झाले. शिक्षणात चांगली गती असूनही प्रकृती अस्वास्थ्यामुळे इ.स. १८७४ साली त्यांना शिक्षण थांबवावे लागले. पण उपजत आवड असल्यामुळे वाचनाचा छंद त्यांनी चालूच ठेवला. प्रकृती सुधारल्यानंतर त्यांना पुन्हा कलकत्ता येथील अल्बर्ट शाळेत घालण्यात आले. इ.स. १८७९ मध्ये त्यांनी महाविद्यालयात दाखल होण्यासाठी असणारी प्रवेश परीक्षा दिली आणि उत्तीर्ण होऊन कलकत्ता विद्यापीठाशी संलग्न असलेल्या एका महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला. पुढील अभ्यासासाठी त्यांनी ईश्र्वरचंद्र विद्यासागर यांनी स्थापन केलेल्या मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यु (Metropolitan instityu) मध्ये प्रवेश घेतला. नंतर त्यांनी कलकत्त्यामधील प्रेसिडेन्सी महाविद्यालयात प्रवेश घेतला. साहित्यात त्यांना खूप रस होता. इंग्रजी बरोबरच त्यांनी लॅटिन (Latin), फ्रेंच (French) आणि संस्कृतमध्येही प्रावीण्य संपादन केले. महान व्यक्तींची चरित्रे वाचण्यात त्यांना रस होता. एकदा त्यांना 'स्थितिक विद्युत' (static electricity) या विषयावर प्रयोग करणारे अमेरिकेतील वैज्ञानिक बेंजामिन फ्रँकलीन यांचे चरित्र वाचण्यास मिळाले. ते वाचून ते खूप प्रभावित झाले. त्यानंतर विज्ञानाची त्यांची आवड वाढली. याच दरम्यान, ते भारतात झालेल्या गिलख्रिस्ट शिष्यवृत्ती स्पर्धा (scholarships) परीक्षेला बसले आणि शिष्यवृत्तीसाठी निवडले गेले. परदेशी जाण्यासाठी मोठ्या कष्टाने त्यांनी आपल्या आईची परवानगी मिळवली. त्यांचे वडील मात्र या निर्णयाने आनंदित झाले होते.

सोमवार, १० नोव्हेंबर, २०१४

जिल्हा औरंगाबाद माहिती (jilha aurangabad mahiti)

औरंगाबाद

सर्वात मोठा प्रशासकीय विभाग

मुख्यालय : औरंगाबाद

क्षेत्रफळ : १०,१०७ चौ. किमी.

तालुके : ९

औरंगाबाद, कन्नड, खुल्ताबाद, गंगापूर, पैठण, फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव, वैजापूर
प्रशासकीय विभागात ८ जिल्ह्यांचा समावेश होतो.

विस्तार : मराठवाडा विभागात, औरंगाबाद जिल्ह्याच्या पूर्वेस : जालना, पश्चिमेस : नाशिक, आग्नेयेस - बीड, दक्षिण व नैऋत्येस : अहमदनगर, उत्तरेस : जळगाव जिल्हा.

लोकसंख्या :  २,८९७,०१३ लाख (इ. २००१)

नद्या : गोदावरी ही मुख्य नदी. पूर्णा, अंजना, शिवना, खाम, येळगंगा या उपनद्या. पुर्णेचा उगम : मेहूण (ता. कन्नड)

धरणे : गोदावरीवरील 'जायकवाडी' हा राज्याचा सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प. त्याअंतर्गत पैठण येथे 'नाथसागर' जलाशय.

पिके : ज्वारी, ऊस, बाजरी, तेलबिया


औद्योगिक : वाळूंज, चिखलठाना येथे औद्योगिक संकुले, धूत यांचा व्हिडिओकॉन हा इलेक्ट्रॉनिक उद्योग.

लघुउद्योग : औरंगाबादच्या हिमरू शाली, महारू किनखाब. पैठणच्या पैठणी, दसन्नी, मंदिल.

शैक्षणिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (स्थापना : १९५८)

पर्यटन स्थळे :
औरंगाबाद : ५२ दरवाजांचे शहर, बिबिका मकबरा, पाणचक्की, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ, दौलताबादनजिक 'देवगिरी' किल्ला.
औरंगाबाद - नगर, बीड सीमेवर जायकवाडी पक्षी अभयारण्य.
गौताळा - औटरमघाट हे औरंगाबाद-जळगाव सीमेवरील अभयारण्य.
वेरूळ : खुल्ताबाद तालुक्यात ऐतिहासिक लेणी व गुंफा मंदिरे, जगप्रसिध्द कौलास लेणे, १२ ज्योतिर्लिंगांपैकी घृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंग.
अजिंठा : सिल्लोड तालुक्यात जगप्रसिध्द लेणी.
पितळखोरा : कन्नड तालुक्यात, सर्वात प्राचीन बौद्धकालन लेणी.
पैठण (प्रतिष्ठान) : सातवाहनांची राजधानी, संत एकनाथांची जन्मभूमी, नाथसागर जलाशय.
आपेगाव : पैठण तालुक्यात, संत ज्ञानेश्वरांचे जन्मगाव.
म्हैसमाळ हे खुल्ताबाद तालुक्यातील थंड हवेचे ठिकाण.