Advertisement

मराठी सण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मराठी सण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २७ मे, २०१४

वटसावित्री Vatsavitra

    एकदा सनत्कुमार ऋषींनी शंकराला प्रश्न विचारला, 'की असे कोणते व्रत आहे की, त्या व्रतापासून अखंड सौभाग्य प्राप्त होते?' या प्रश्नाचे उत्तर म्हणून भगवान शंकरांनी एक कथा सांगितली. तीच ही वटसावित्रीची कथा?
    मद्र देशात अश्वपती नावाचा राजा होता. हा महाज्ञानी, धार्मिक होता. पण त्याला संतती नव्हती. सावित्रीदेविच्या उपासनेने त्याला एक कन्या होते. तिचे नाव वरदासावित्री असे ठेवले. यथावकाश सावित्री उपवर झाली म्हमून अश्वपतीराजाने तिला आवडेल असा सर्वगुणसंपन्न पती वरण्यास सांगितले. सावित्रीने द्युमत्सेन राजाचा पुत्र - सत्यवानास वरले. सत्यवानाचा पिता आंधळा व राज्यभ्रष्ट होता. म्हणून तो आपल्या परिवारासहित अरण्यात राहत होता. सत्यवान हा शूर, गुणसंपन्न असला तरी तो अल्पायुषी आहे व आजपासून वर्षाने देहत्याग करील. हे देवर्षी नारदानी अश्वपतीला भाकित सांगितले होते. म्हणून अश्वपतिराजाने सावित्रीला दुसऱ्या वराची निवड करण्यास सांगितले. पण सावित्रीने निश्चयपूर्वक सत्यवानाशीच विवाह केला. काही काळ लोटल्यानंतर सावित्रीने नारदांनी सांगितलेले ते भविष्य न विसरता वटसावित्री व्रताचा नियम केला. आपल्या पतीच्या आयुष्याचे तीन दिवस राहिले असून चौथा दिवस त्याच्या मरणाचा आहे, हे जाणून त्रिरात्र व्रत केले. चौथ्या दिवशी व्रताची समाप्ती केली.
    त्याच दिवशी सत्यवानाबरोबर सावित्री अरण्यात गेली. लाकडे तोडून झाल्यावर सत्यवानाला अति श्रमाने ग्लानी आली. म्हणून सत्यवान एका वडाच्या झाडाखाली सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून झोपला. थोड्याच वेळात सत्यवानाचे प्राण नेण्यासाठी यम स्वतः आला. सावित्रीने त्याला ओळखले व नमस्कार केला. सत्यवानाचे प्राण घेऊन यम जाऊ लागला. तेव्हा सावित्रीही दुःखित होऊन यमाच्या मागून जाऊ लागली. यमाने तिला परत जायला सांगितले. यमाचे शब्द ऐकून सावित्रीने पतिनिष्ठा, कर्तव्य, प्रतिव्रतेच्या भावना याचे विव्द्त्तापुर्वक विवेचन केले. तिचीही वाणी ऐकून यम प्रसन्न झाला. यमाने तिला पतीच्या प्रनाशिवाय काहीही मागायला सांगितले, तेव्हा सावित्रीने आपल्या सासऱ्यांची दृष्टी परत मिळावी असा वर मागितला. यमाने तथास्तू म्हटले, त्यामुळे दिव्याशक्तीने सावित्रीच्या सासऱ्याला दृष्टिलाभ झाला. तरीसुद्धा सावित्री यमाच्या मागून चालतच राहिली. यमाने पुन्हा तिला सांगितले की, हे देवी तुला या चालण्याचे श्रम होतील, तेव्हा तू परत जा. तेव्हा सावित्री म्हणाली की, पतीच्या सान्निध्यात असताना श्रम कोणते? ज्या मार्गाने माझे पती जातील तेथेच मला गेले पाहिजे. हे तिचे बोलणे ऐकून व पतिनिष्ठा पाहून यमाने तिला दुसरा वर मागायला सांगितले. तिने आपल्या राज्यभ्रष्ट सासऱ्यांचे राज्य परत मागितले. त्यामुळे तिच्या सासऱ्यांचे राज्य परत मिळाले. तरीसुद्धा दूर अंतरापर्यंत सावित्री यमापाठून चालत राहिली. वाटेत तिने यमाला सत्पुरुषांच्या सनातन धर्मासंबंधी सांगितले. हे ऐकून यमराजाने तिला सत्यवानाच्या प्रनाशिवाय तिसरा वर मागायला सांगितला. तरीही सावित्री यमाच्या पाठोपाठ चालत राहिली. वाटेत ती यमाला सांगते की, तुम्ही साक्षात सूर्याचे पुत्र. स्वधर्माने तुम्ही प्रजा चालवता म्हणून तुम्ही धर्मराज ओळखले जाता. हे शुभवचन ऐकून यमराजा संतुष्ट झाला व तिला सत्यवानाच्या प्राणाशिवाय चवथा वर मागायला सांगितला. तेव्हा सावित्रीने सत्यवानाला शंभर पुत्र व्हावेत व पतिकुळ वृद्धिंगत व्हावे असा वर मागितला तरीही सावित्री यमामागे जावू लागली. वाटेत तिने यमाला साधूंच्या वृत्तीविषयी, सत्पुरुषांच्या गुणांविषयी, त्याच्या परोपकारांविषयी सांगितले. यमराजाने तिच्या ह्या बोलण्याने संतुष्ट होऊन एक अप्रतिम वर मागायला सांगितला. तेव्हा सावित्री म्हणाली की, मला स्वर्गसुख नको. पतिशिवाय मला कशातच सुख मिळणार नाही.
    तुझे वचन खरे ठरण्यासाठी, सत्यवानाला शंभर पुत्र होण्यासाठी त्यांचे प्राण परत कर. शेवटी यमराजाने सत्यवानाचे प्राण परत केले. अशा प्रकारे पातिव्रत्याच्या बळावर सावित्रीने आपल्या पतीकुळाचा उद्धार केला. आपल्या दिव्यशक्तीने प्रत्यक्ष यमाकडून आपल्या पतीला जीवणदान दिले.      

सोमवार, ३१ मार्च, २०१४

गुढी पाडवा Gudhi Padva

गुढी पाडवा



हिंदू धर्मियांच्या नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडवा या सणाने होत असते. मनाला प्रसन्न वाटणाऱ्या चैत्र महिन्यात हा सण साजरा करतात. चैत्र महिन्यात सर्वत्र प्रसन्नतेचे वातावरण असते.
वृक्षांना नवीन पालवी फुटते. लहान बाळाप्रमाणे झाडे सुंदर दिसतात. या महिन्यात सर्वत्र  पर्णरुपी रंगाची उदळण सुरू असते आणि याच महिन्यात नववर्षाला प्रारंभ होतो, हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्यामुळे ह्या दिवशी नवे काम करण्यात शुभारंभ करीत असतात. नवीन वर्षाचा आनंद वक्त करण्यासाठी गुढी घरोघरी उभारली जाते. म्हणून या सणाला 'गुढीपाडवा' म्हणून ओळखतात. हा सण ज्या वाराच्या अधिपतीची पूजा केली जाते. या दिवशी पहाटे उठून घर स्वच्छ केले जाते. सुबकशी रांगोळी काढून घरातील वडीलधारी ,मंडळी वेळूची काठी स्वच्छ धुवून तिच्या टोकास तांबडे वस्त्र व फुलांची माळ बांधतात. वर लोटी ठेवतात. फुलांच्या माळेबरोबर साखरेची पदके असलेली माळ असावी मग ती काठी रांगोळी घातलेल्या जागेवर उंच उभी करावी आणि पूजा करून कडुलिंबाच्या कोवळ्या पानात, हरभऱ्याची डाळ, ओवा, मीठ, गुळ, घालून हे मिश्रण वाटले जाते. नंतर हा प्रसाद सर्वांना देतात. सूर्यास्तापूर्वी गुढी उतरावयची असते. पण यापूर्वी परत एकदा हळदकुंकू-अक्षता वाढून गुढीची पूजा करावी. या दिवशी ऐतिहासिकरित्यासुद्धा खूप महत्व आहे.
पण त्यापूर्वी अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या. काही आख्यायिक प्रचलित आहेत.याच दिवशी प्रभू श्रीरामचंद्रांनी लंकाधीश रावणाला ठार करून विजयी होऊन आयोध्या नगरात प्रवेश केला होता. तोच हा दिवस वर्षप्रतिपदेचा होता. या दिवशी नवीन वस्तू खरेदी करण्याची पद्धत आहे. ब्रम्हदेवाने या सृष्टीला निर्माण करण्यास या दिवसापासूनच सुरुवात केली होती तो मास चैत्र होता. बसू नावाचा राजा तपश्चर्या करून मनुजेंद्र झाला व अमरेंद्राने या दिवशी वस्त्रालंकार देऊन त्याचा गौरव केला तो हाच दिवस होता. इंद्राने वृत्तसुरास ठार मारले तो दिवसही चैत्रशुद्ध प्रतिपदेचा होता. शालिवाहनाने शकाचा पराभव करण्यासाठी मातीचे सहा हजार सैनिक तयार केले, त्यात प्राण निर्माण करून फौज तयार केली. थंड निर्जीव समाजाला पुनःजीवनदान देण्याचे कार्य याच मासात झाले. त्याची आठवण राहण्याची इसवी सन व शालिवाहन शक यात ७८ वर्षाचा फरक आहे. या सगळ्या शुभ कृत्यांचा आरंभ या मुहूर्तावर झाला म्हणून हा पाडवाच आहे. या दिवसापासूनच आपण आपले आचरण पवित्र ठेवण्याच्या संकल्प करायला पाहिजे. आपण शेजारी, मित्र-मैत्रीणी नातेवाईक यांना प्रेमाने व नवीन वर्ष सगळ्यांना आनंद व भराभराटीचे जावो अशी शुभेच्छा वक्त करावी विद्यार्थांनी दररोज नियमित अभ्यास करण्यात, आईवडिलांचा मान ठेवण्याचा संकल्प करावा. आलेल्या परिस्थितीत आनंदी राहण्याचे व्रत घ्यावे.
आनंद, उल्हास चैतन्य देणारी गुढी नेहमीच आकाशाला भिडू दे!
(थोडक्यात : चैत्र हा मराठीच्या कालगणनेनुसार वर्षातला पहिला महिना. या महिन्यापासून आपल्या नव्या वर्षाची सुरुवात होते. आपण या नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या आनंदाने, उत्साहाने करतो. घराला आंब्याच्या झाडाच्या पानाचे तोरणे लावतो वर्षच्या या पहिल्या सणाला गुढीपाडवा किंवा वर्षप्रतिपदा असे म्हणतात.
सूर्योदयाच्या वेळी सगळीकडे आनंद पसरलेला असतो अशा वेळी गृहिणी अंगन झाडून स्वच्छ करतात त्यावर रांगोळी काढतात. नववर्षाच्या स्वागताला गुढी उभारली जाते. बांबूची उंच काळी, रेशमी वस्त्राने सजवतात. त्यावर तांब्या पितळेचे पात्र ठेवले जाते हार, गाठी, कडू लिंबाची डहाळी त्याला लावली जाते अशा प्रकारे तयार केलेल्या गुढीची पूजा करतात आणि अंगणात उभारतात. उंच उभारलेली ही गुढी उंच आहे, तशी तुमची प्रगती होऊ द्या. या दिवशी आपल्या मित्र मैत्रिणींना भेटून मुले नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात. )