Advertisement

शनिवार, २९ नोव्हेंबर, २०१४

उभयविध क्रियापदे ubhayavidha verb

एकाच क्रियापद दोन वेगळ्या वाक्यांत सकर्मक (transitive) व अकर्मक (intransitive) असे दोन्ही तऱ्हेनी वापरता येते; अशा क्रियापदांना 'उभयविध क्रियापदे' असे म्हणतात.
वाक्ये पहा -
१) अ) त्याने घराचे दार उघडले.     ब) त्याच्या घराचे दार उघडले.
२) अ) रामाने धनुष्य मोडले.        ब) ते लाकडी धनुष्य मोडले.

१) गटातील दोन्ही वाक्यांत 'उघडले' हे क्रियापद आहे. पहिल्या वाक्यात ते सकर्मक वापरले आहे. या वाक्यात 'त्याने' कर्ता असून 'दार' हे कर्म आहे. 'उघडले' क्रियापद सकर्मक आहे.
दुसऱ्या वाक्यात 'उघडले' हेच क्रियापद आहे. इथे 'उघडणारे कोण' या प्रश्नाचे उत्तर 'दार' येते. तर 'उघडण्याची क्रिया कोणावर घडली?' या प्रश्नाचे उत्तरही 'दार' येते. याचा अर्थ 'उघडले' क्रियापद इथे 'अकर्मक' आहे.

२) गटातील वाक्यांत 'मोडले' हे क्रियापद आहे. त्यापैकी पहिल्या वाक्यात 'मोडले' हे क्रियापद सकर्मक आहे, तर दुसऱ्या वाक्यात ते अकर्मक आहे.
यावरून असे दिसते की, एकाच क्रियापद दोन वेगळ्या वाक्यांत सकर्मक व अकर्मक असे दोन्ही तऱ्हांनी वापरता येते; अशा क्रियापदांना 'उभयविध क्रियापदे' असे म्हणतात. काप, आठव, स्मर, लोट हे धातू या प्रकारचे होत.


बुधवार, २६ नोव्हेंबर, २०१४

विधीविशेषण Vidhīviśēṣaṇa vidhivisesana

विशेषण हे सामान्यतः विशेष्याच्या पूर्वी असते. जसे - 'चांगला मुलगा सर्वांना आवडतो.' इथे चांगला हे अधिविशेषण किंवा पूर्वविशेषण होय. पण कधी - कधी विशेषण विशेष्याच्या नंतर येऊन विधेयात विशेष्याबद्दलचे विधान पूर्ण करते. जसे 'तो मुलगा आहे चांगला.' अशा विशेषणाला विधीविशेषण किंवा उत्तरविशेषण 'तो मुलगा आहे चांगला.' अशा विशेषणाला विधीविशेषण किंवा उत्तरविशेषण (uttaravisesana)
असे म्हणतात. पुढील वाक्य पहा -
१) मुलगा हुशार आहे.
२) गणेशचे अक्षर सुंदर आहे.
३) आजची पूजा चांगली झाली.

वरील वाक्यांतील 'हुशार' हे विशेषण 'मुलगा' या नामाबद्दल अधिक माहिती देते व ते नामानंतर आले आहे. 'सुंदर' हे विशेषण 'अक्षर' या नामाबद्दल अधिक माहिती सांगते व नामानंतर आले आहे. 'चांगली' हे विशेषण 'पूजा' या नामाबद्दल अधिक माहिती सांगते व ते नामानंतर आले आहे. 'हुशार, सुंदर, चांगले' ही विधिविशेषणे आहे.

नामापूर्वी येणाऱ्या विशेषणाला अधिविशेषण म्हणतात, तर नामानंतर येणाऱ्या विशेषणाला विधिविशेषण असे म्हणतात.

सोमवार, २४ नोव्हेंबर, २०१४

क्रियाविशेषण अव्यय (Kriyāviśēṣaṇa avyaya)

(क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय म्हणतात)

अधोरेखित शब्द पहा
१) राजेश चालतो.
२) राजेश हळूहळू चालतो.

दुसऱ्या वाक्यात 'हळूहळू' या शब्दाने राजेश कसा चालतो, हे सांगितले आहे. 'हळूहळू' या शब्दाने 'चालतो' क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगितली आहे.

'हळूहळू' हे 'चालतो' या क्रियापदाचे विशेषण आहे. यालाच क्रियाविशेषण म्हणतात; म्हणून 'हळूहळू' हे क्रियाविशेषण आहे. क्रियाविशेषण हे अविकारी असल्यामुळे त्याला अव्यय म्हणतात.

वाक्ये वाचा व समजून घ्या :

१) ससा तुरुतुरु पळतो. (कसा पळतो? - तुरुतुरु)
२) आई काल गावाला गेली. (कधी गेली? - काल)
३) येथे वह्या - पुस्तके मिळतात. (कोठे मिळतात? - येथे)
४) दिवसातून दोनदा जेवावे. (किती वेळा जेवावे? - दोनदा)

'कसा, कधी, कोठे, किती' हे प्रश्न क्रियापदाला विचारले की जी उत्तरे येतात, ती क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणारी असतात. वरील वाक्यांतील 'तुरुतुरु, काल, येथे, दोनदा' हे शब्द त्या त्या वाक्यांतील क्रियापदांबद्दल विशेष माहिती सांगतात.

क्रियाविशेषणे वाचा -

अलीकडे
लगेच
खुलून
खूप
एकदम
पटापट
संथ
जवळ
सतत
सावकाश
जिकडेतिकडे
काळ
ताबडतोब
आकर्षक
टकमका
संध्याकाळी

बुधवार, १९ नोव्हेंबर, २०१४

मराठी क्रियापदांचे प्रकार marathi kriyapadache prakar

क्रियापदांचे प्रकारक्रियापदांचे तीन प्रकार आहेत.
१) सकर्मक क्रियापद    २) अकर्मक क्रियापद    ३) संयुक्त क्रियापद


१) सकर्मक क्रियापद
वाक्यातील क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास जेव्हा कर्माची जरुरी लागते; त्याला सकर्मक क्रियापद म्हणतात; म्हणून 'करतो' हे सकर्मक क्रियापद आहे.
खालील वाक्य पहा
- राजेश अभ्यास करतो.
वरील वाक्यात करतो हे क्रियापद आहे.
करण्याची क्रिया करणारा राजेश; म्हणून राजेश हा कर्ता आहे.
करण्याची क्रिया अभ्यासावर घडते; म्हणून अभ्यास हे कर्म आहे.
म्हणजेच,
राजेश    अभ्यास    करतो.
 ↓            
             
 कर्ता      कर्म       क्रियापद

खालील वाक्य पहा
- राजेश करतो. (येथे कर्म काढून टाकले आहे.)
वरील वाक्याला काहीच अर्थ नाही.
म्हणजेच, वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही.
म्हणजेच, करतो या क्रियापदाला कर्माची जरुरी आहे. सकर्मक म्हणजे कर्मासहित (बरोबर, सह) असते ते.
म्हणून,  राजेश    अभ्यास    करतो.
             
                         
              कर्ता       कर्म        सकर्मक क्रियापद

२) अकर्मक क्रियापद
ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची जरुरी लागत नाही व क्रिया कर्त्याशीच थांबते तेव्हा त्या क्रियापदाला अकर्मक क्रियापद म्हणतात, म्हणून
'पळतो' हे अकर्मक क्रियापद आहे.

खालील वाक्य पहा
राजेश पळतो.
वरील वाक्यात पळतो हे क्रियापद आहे.
पळण्याची क्रिया करणारा राजेश; म्हणून राजेश हा कर्ता आहे.
राजेश      पळतो
 
             
कर्ता       क्रियापदम्हणजेच, या वाक्यात पळण्याची क्रिया कर्ता करतो व ती कर्त्यापाशी थांबते.
म्हणून,
'राजेश पळतो' हे वाक्य पूर्ण अर्थाचे आहे.
पळतो या क्रियापदाला कर्माची जरुरी नाही.

- अकर्मक म्हणजे कर्म नसते ते.
म्हणून,   राजेश     पळतो
               
            
               कर्ता       अकर्मक क्रियापद


३) संयुक्त क्रियापद
धातुसाधित व सहायक क्रियापद मिळून बनणाऱ्या क्रियापदाला संयुक्त क्रियापद म्हणतात; म्हणून 'खेळू लागला' हे संयुक्त क्रियापद आहे.वाक्यातील अधोरेखित शब्दांकडे नीट लक्ष द्या -
आपण दोघे मैदानात खेळू.
खेळू या शब्दात खेळण्याची क्रिया आहे.
खेळू हा क्रियावाचक शद्ब आहे.
खेळू हा शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करतो.
म्हणजेच 'खेळू' हे क्रियापद आहे.

१) राजेश मैदानात खेळू. (वाक्य अर्थपूर्ण नाही)
२) राजेश मैदानात लागला. (वाक्य अर्थपूर्ण नाही)
३) राजेश मैदानात खेळू लागला. (वाक्य अर्थपूर्ण आहे.)

पहिल्या वाक्यात खेळू हा क्रियावाचक शद्ब आहे; पण तो वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही.
दुसऱ्या वाक्यात लागला हा क्रियावाचक शब्द आहे; पण तो वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही.
तिसऱ्या वाक्यात खेळूलागला हे दोन क्रियावाचक शब्द एकत्र आल्याने ते वाक्याचा अर्थ पूर्ण करतात.

म्हणजेच 'खेळू लागला' या दोन शब्दांनी मिळून वाक्याचा अर्थ पूर्ण होतो.
इथे खेळू हा शब्द 'खेळ' या धातूपासून बनलेला असल्यामुळे तो शब्द धातुसाधित किंवा कृदन्त आहे, तर लागला या क्रियावाचक शब्दाने खेळण्याची क्रिया पूर्ण करण्यासाठी मदत किंवा साहाय्य केले आहे; म्हणून 'लागला' हे सहायक क्रियापद आहे.

म्हणून 'खेळू लागला' हे क्रियापद धातुसाधित (कृदन्त)सहायक क्रियापद यांनी मिळून बनले आहे.
खेळू     +   लागला = खेळू लागला.
(धातुसाधित / कृदन्त) + (सहायक क्रियापद) = संयुक्त क्रियापद.

संयुक्त क्रियापदे : घेऊन गेली, होऊ शकतो, करून टाक, सांगून ये, वाटत असे, जायला पाहिजे, रंगले होते, पाहता आले.

रविवार, १६ नोव्हेंबर, २०१४

आचार्य डॉ. प्रफुल्लचंद्र रे (aachary dr prafullachandra re)

भारताचे महान रसायनशास्त्रज्ञ आणि वैज्ञानिक आचार्य डॉ. प्रफुल्लचंद्र रे यांचा जन्म २ ऑगस्ट, १८६१ रोजी तत्कालीन पूर्व बंगालमधील (सध्याच्या बांग्लादेशमधील) रादौली काठीपाढा (kathipadha) या गावात एका समृध्द व सुसंस्कृत कुटुंबात झाला. त्यांचे वडील हरिश बाबू हे बंगालमधील पाश्चात्त्य शिक्षणाच्या प्रवर्तकांपैकी एक होते. त्यांनी मॉडेल इंग्रजी शाळेची (Modal english school) स्थापना केली. त्या वेळेचे समाजसुधारक जतींद्र मोहन ठाकूर, ईश्वरचंद्र विद्यासागर
विज्ञानाचा अभ्यास केल्यानंतर इ.स. १८८२ मध्ये रे यांनी इंग्लंडला जाऊन, एडिनबरो विद्यापीठात प्रवेश घेतला. तेथे प्रसिध्द रसायनशास्त्रज्ञ अलेक्झांदर ब्राडन यांच्या संपर्कात ते आले. त्यामुळे रसायनशास्त्रातील त्यांना असणारी आवड अधिकच वाढली. तेथे ते डॉक्टर गिब्सन, डॉक्टर डोबीन आणि अन्य प्रसिद्ध विद्यानांच्या संपर्कात आले. त्यांनी जर्मन भाषा आणि जर्मन वैज्ञानिकांच्या ग्रंथांचा अभ्यास केला. भारतातील तत्कालीन प्रसिध्द वैज्ञानिक जगदीशचंद्र बोस यांचीही त्यांनी भेट घेतली. ते दोघे एकमेकांचे चांगले मित्र झाले. इ.स. १८८५ मध्ये एडिनबरो विद्यापीठातून बी.एस्सी. पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी मूळ धातूंच्या विश्लेषणासाठी संशोधन कार्य सुरू केले. इ.स. १८८७ मध्ये डी. एस्सी. ही पदवी प्राप्त केली. एडिनबरो विद्यापीठात त्यांनी काही पुरस्कार आणि काही शिष्यवृत्याही मिळवल्या. इ.स. १८८८ मध्ये विद्यापीठाच्या 'केमिकल्स सोसायटी' चे उपाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. या देदीप्यमान यशप्राप्तीनंतर इ.स. १८८८ मध्ये कलकत्ता येथे ते परत आले. त्यांनी रु. २५० प्रतिमाह पगारावर सहाय्यक प्राध्यापक म्हणून तेथील प्रेसिडेन्सी महाविद्यालयात नोकरीस प्रारंभ केला.
महाविद्यालयातील अध्यापन कामाव्यतिरिक्त निरनिराळ्या नायट्रेटस्वर (nayatretas on) त्यांनी संशोधन सुरू केले. त्यांचे राहणीमान अतिशय साधे होते. पाश्चात्त्य पेहरावाचा त्याग करून त्यांनी भारतीय वेशभूषा (सदरा व लेंगा) स्वीकारली होती. जी काही बचत त्यांना शक्य होती, ती ते विज्ञानविषयक कामावर आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी खर्च करत. आपल्या घरातच त्यांनी एक लहानशी प्रयोगशाळा बनवली होती. इ.स. १८९५ मध्ये त्यांनी संशोधन केलेल्या 'मर्क्युरिक नायट्रेट' या अत्यंत महत्त्वाच्या पहिल्या संशोशानाची घोषणा करण्यात आली. त्यांच्या या संशोधनाने रसायनशास्त्रात संशोधन करणाऱ्या जगातील सर्व विज्ञानिकांचे लक्ष वेधून घेतले. भारताच्या गरिबीमुळे नेहमी चिंतित असणाऱ्या प्रफुल्लचंद्रांचा असा ठाम विश्वास होता की, रासायनिक आणि औषध उद्योगांची स्थापना केल्याने केवळ चांगले रोजगार निर्माण होतील असे नाही; तर या क्षेत्रात आपला देश स्वयंपूर्णही बनेल. याशिवाय अशा प्रयत्रामुळे औषधांच्या अभावी प्राणघातक ठरणाऱ्या रोगांपासून अनेक रोग्यांचे जीवन देखील वाचू शकेल.
बेरोजगार पदवीधर विज्ञान स्नातकांसाठी लहान-मोठे उद्योग स्थापन करण्याची त्यांची इच्छा होती. इ.स. १९०१ मध्ये चिनी मातीची भांडी बनविणाऱ्या 'कलकत्ता पॉटरी वर्स्क' ची स्थापना करण्यात त्यांनी मदत केली. याशिवाय त्यांनी 'बंगाल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल वर्क्स लि.' ची स्थापना केली.
यासाठी त्यांनी एका ट्रस्टची स्थापनाही केली. देशासाठी आणि विशेषकरून बंगालसाठी ही संस्था एक वरदान ठरली. सुरुवातीला प्रेसिडेन्सी महाविद्यालयातील रसायनशास्त्र पदवीधरांना व त्यांच्यासारख्या इतर विद्यार्थांना रोजगार प्राप्त करण्यासाठी आणि स्वयंपूर्ण बनण्यासाठी मदत केली. त्यांचा दुसरा शोध अमोनिअम नायट्रेट हा होता. नायट्राइटमधील यशस्वी संशोधनासाठी प्राध्यापक आर्मस्ट्राँग यांनी 'मास्टर ऑफ नायट्राइट' ही पदवी त्यांना दिली. नायट्राइटमधील त्यांच्या संशोधनाने जगाचे लक्ष वेधले. या प्रभावी यशाने प्रेरित होऊन इ.स. १९०४ मध्ये बंगाल सरकारने त्यांना युरोपियन देशांमधील विविध प्रयोगशाळांना भेट देण्यासाठी पाठवले. या शैक्षणिक दैऱ्याच्या काळात त्यांनी आपल्या शोधांच्या संदर्भात व्याख्यानेही दिली. याशिवाय इ.स. १९०२ मध्ये प्रकाशित झालेले त्यांचे पुस्तक 'इंडियन केमिकल हिस्टरी' जगभरात चर्चेचा विषय ठरले. डरहॅम विद्यापीठच्या कुलपतींनी देखील या पुस्तकाची स्तुती केली. डॉ. रे यांनी १३ व १४ व्या शतकांत भारतीय रसायनशास्त्रज्ञांनी केलेल्या कार्याबद्दल विस्ताराने लिखाण केले आहे. या पुस्तकात त्यांनी भारतीय संस्कृतीचे यथार्थ आणि वास्तव चित्रण सादर केले.
इ.स. १९११ साली सरकारने त्यांना 'नाइट  हुड' ही पदवी प्रदान केली. इ.स. १९१२ मध्ये विद्यापीठांच्या प्रथम संमेलनात सहभागी होण्यासाठी कलकत्ता विद्यापीठाचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी दुसऱ्यांदा युरोपचा दौरा केला. त्याच वर्षी डरहॅम विद्यापीठाने त्यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी देऊन सन्मानित केले. इ.स. १९१८ मध्ये व्याख्यान देण्यासाठी मद्रास विद्यापीठाचे (आताचे चेन्नई) निमंत्रण त्यांनी स्वीकारले. विद्यापीठांकडून जे मानधन मिळाले, ते त्यांनी शिष्यवृत्तीच्या रूपात विद्यार्थ्यांना देऊन टाकले. इ.स. १९१७ मध्ये कोलकाता येथे झालेल्या भारतीय सामाजिक संमेलनाच्या अध्यक्षपदी (The chairman of the Indian social gathering) त्यांची नेमणूक झाली. इ.स. १९२० साली झालेल्या भारतीय विज्ञान कॉंग्रेसचे ते सभापती झाले. त्याच वर्षी त्यांना गांधीजींना भेटण्याची संधी मिळाली. गांधीवादी आदर्श आणि खादीप्रधान जीवनशैली यांनी प्रभावित होऊन अहिंसा आंदोलनाचे ते कट्टर समर्थक बनले. खुलना जिल्ह्यात जेव्हा कडकडीत दुष्काळ पडला, तेव्हा सर्व कामे सोडून मदतकार्यात सहभागी होण्यासाठी रे तेथे पोहोचले. त्यांनी रोजगाराचे एक साधन म्हणून गरीब लोकांत चरख्याचा उपयोग लोकप्रिय बनवला. चरख्याचे अर्थशास्त्र नवीन पद्धतीने त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवले.
इ.स. १९२१ मध्ये त्यांनी वयाची ६० वर्षे पूर्ण केली, तेव्हा आपला संपूर्ण पगार विज्ञान व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या विकासासाठी विद्यापीठाला देणगी म्हणून दिला. दरवर्षी मिळणाऱ्या १,३०,२०० रुपयांवर व्याजातून दोन विद्यार्थ्यांना डॉ. पी. सी. रे. शिष्यवृत्ती दिली जाई. इ.स. १९२२ मध्ये त्यांनी अनुक्रमे मायक्रो बायोलॉजी आणि जीवाश्स्त्र या विषयांमधील सर्वोत्तम विद्यार्थ्याला १२,००० रुपयांचा 'नागार्जुन पुरस्कार' आणि ११,००० रुपयांचा 'सर आशुतोष मुकर्जी पुरस्कार' जाहीर केला. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी देणगी देणारे लोक असतात; परंतु, दुसऱ्यांच्या नावाने शिष्यवृत्तीसाठी आपला पैसा देणारे लोक कमी असतात; खरोखरच, असे लोक महान होत.
सर आशुतोष मुकर्जी कलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. नंतर त्यांची नेमणूक कलकत्ता विद्यापीठाचे कुलपती म्हणून करण्यात आली. त्यांनी विद्यापीठामध्ये विज्ञान शिक्षणाच्या प्रगतीसाठी केलेल्या प्रयत्नांचे आणि विज्ञानात केलेल्या योगदानाचे महत्त्व लक्षात घेऊन प्रफुल्लचंद्र रे यांनी त्यांच्या सन्मानार्थ एक शिष्यवृत्ती जाहीर करण्याचा निर्णन घेतला. इ.स. १९२४ मध्ये डॉक्टर पी. सी. रे, जे. एन, मुकर्जी, जे. सी. घोष आणि शांतीस्वरूप भटनागर यांनी 'इंडियन केमिकल सोसायटी' (Indian Chemical Society) ची स्थापना केली. संस्थेच्या खर्चासाठी १२,००० रु. चे सुरुवातीचे योगदान रे यांनी दिले. या संस्थेचे ते दोन वर्षे अध्यक्ष होते.
इ.स. १९३२ मध्ये 'एका बंगाली रसायनतज्ज्ञाचे जीवनचरित्र व त्यांचे अनुभव' (द लाइफ-स्केच अँड एक्सपीरियन्सेस ऑफ अ बंगाली केमिस्ट) या शीर्षकाचे आत्मचरित्र त्यांनी लिहिले. इ.स. १९३४ मध्ये लंडन केमिकल सोसायटीने त्यांना सन्माननीय सदस्यत्व प्रदान केले. इ.स. १९३६ साली 'रसायनशास्त्राचे वयोवृद्ध प्राध्यापक' म्हणून ते विद्यापीठातून निवृत्त झाले. त्यांच्या सेवाकाळाची स्तुती करत विद्यापीठाने त्यांची तहहयात सन्माननीय विद्वान प्राध्यापक म्हणून नियुक्ती केली. ते मुलत: संत स्वभावाचे प्राध्यापक होते. शिवाय ते अतिशय मृदुभाषी (Soft spoken) आणि दयाळू (clement) होते. १४ जून, १९४४ रोजी या वैज्ञानिकाचे विद्यापीठाच्या वास्तूतच निधन झाले. रवींद्रनाथ टागोरांवर ज्या ठिकाणी अंतिम संस्कार केले गेले होते, त्या स्थानाच्या जवळच या महान वैज्ञानिकावर अंतिम संस्कार करण्यात आले. आपण या बहुआयामी व्यक्तीमत्त्व असणाऱ्या आणि देशासाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या थोर पुरुषाला श्रद्धांजली वाहू या.
आदींशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. नाजूक प्रकुतीचे असले तरी, प्रफुल्लचंद्र अतिशय बुद्धिमान व प्रतिभाशाली होते. जन्मगावी प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर इ.स. १८७० साली कलकत्ता येथील हैयर स्कूलमध्ये ते दाखल झाले. शिक्षणात चांगली गती असूनही प्रकृती अस्वास्थ्यामुळे इ.स. १८७४ साली त्यांना शिक्षण थांबवावे लागले. पण उपजत आवड असल्यामुळे वाचनाचा छंद त्यांनी चालूच ठेवला. प्रकृती सुधारल्यानंतर त्यांना पुन्हा कलकत्ता येथील अल्बर्ट शाळेत घालण्यात आले. इ.स. १८७९ मध्ये त्यांनी महाविद्यालयात दाखल होण्यासाठी असणारी प्रवेश परीक्षा दिली आणि उत्तीर्ण होऊन कलकत्ता विद्यापीठाशी संलग्न असलेल्या एका महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला. पुढील अभ्यासासाठी त्यांनी ईश्र्वरचंद्र विद्यासागर यांनी स्थापन केलेल्या मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यु (Metropolitan instityu) मध्ये प्रवेश घेतला. नंतर त्यांनी कलकत्त्यामधील प्रेसिडेन्सी महाविद्यालयात प्रवेश घेतला. साहित्यात त्यांना खूप रस होता. इंग्रजी बरोबरच त्यांनी लॅटिन (Latin), फ्रेंच (French) आणि संस्कृतमध्येही प्रावीण्य संपादन केले. महान व्यक्तींची चरित्रे वाचण्यात त्यांना रस होता. एकदा त्यांना 'स्थितिक विद्युत' (static electricity) या विषयावर प्रयोग करणारे अमेरिकेतील वैज्ञानिक बेंजामिन फ्रँकलीन यांचे चरित्र वाचण्यास मिळाले. ते वाचून ते खूप प्रभावित झाले. त्यानंतर विज्ञानाची त्यांची आवड वाढली. याच दरम्यान, ते भारतात झालेल्या गिलख्रिस्ट शिष्यवृत्ती स्पर्धा (scholarships) परीक्षेला बसले आणि शिष्यवृत्तीसाठी निवडले गेले. परदेशी जाण्यासाठी मोठ्या कष्टाने त्यांनी आपल्या आईची परवानगी मिळवली. त्यांचे वडील मात्र या निर्णयाने आनंदित झाले होते.

सोमवार, १० नोव्हेंबर, २०१४

जिल्हा औरंगाबाद माहिती (jilha aurangabad mahiti)

औरंगाबाद

सर्वात मोठा प्रशासकीय विभाग

मुख्यालय : औरंगाबाद

क्षेत्रफळ : १०,१०७ चौ. किमी.

तालुके : ९

औरंगाबाद, कन्नड, खुल्ताबाद, गंगापूर, पैठण, फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव, वैजापूर
प्रशासकीय विभागात ८ जिल्ह्यांचा समावेश होतो.

विस्तार : मराठवाडा विभागात, औरंगाबाद जिल्ह्याच्या पूर्वेस : जालना, पश्चिमेस : नाशिक, आग्नेयेस - बीड, दक्षिण व नैऋत्येस : अहमदनगर, उत्तरेस : जळगाव जिल्हा.

लोकसंख्या :  २,८९७,०१३ लाख (इ. २००१)

नद्या : गोदावरी ही मुख्य नदी. पूर्णा, अंजना, शिवना, खाम, येळगंगा या उपनद्या. पुर्णेचा उगम : मेहूण (ता. कन्नड)

धरणे : गोदावरीवरील 'जायकवाडी' हा राज्याचा सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प. त्याअंतर्गत पैठण येथे 'नाथसागर' जलाशय.

पिके : ज्वारी, ऊस, बाजरी, तेलबिया


औद्योगिक : वाळूंज, चिखलठाना येथे औद्योगिक संकुले, धूत यांचा व्हिडिओकॉन हा इलेक्ट्रॉनिक उद्योग.

लघुउद्योग : औरंगाबादच्या हिमरू शाली, महारू किनखाब. पैठणच्या पैठणी, दसन्नी, मंदिल.

शैक्षणिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (स्थापना : १९५८)

पर्यटन स्थळे :
औरंगाबाद : ५२ दरवाजांचे शहर, बिबिका मकबरा, पाणचक्की, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ, दौलताबादनजिक 'देवगिरी' किल्ला.
औरंगाबाद - नगर, बीड सीमेवर जायकवाडी पक्षी अभयारण्य.
गौताळा - औटरमघाट हे औरंगाबाद-जळगाव सीमेवरील अभयारण्य.
वेरूळ : खुल्ताबाद तालुक्यात ऐतिहासिक लेणी व गुंफा मंदिरे, जगप्रसिध्द कौलास लेणे, १२ ज्योतिर्लिंगांपैकी घृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंग.
अजिंठा : सिल्लोड तालुक्यात जगप्रसिध्द लेणी.
पितळखोरा : कन्नड तालुक्यात, सर्वात प्राचीन बौद्धकालन लेणी.
पैठण (प्रतिष्ठान) : सातवाहनांची राजधानी, संत एकनाथांची जन्मभूमी, नाथसागर जलाशय.
आपेगाव : पैठण तालुक्यात, संत ज्ञानेश्वरांचे जन्मगाव.
म्हैसमाळ हे खुल्ताबाद तालुक्यातील थंड हवेचे ठिकाण.

मंगळवार, ४ नोव्हेंबर, २०१४

जिल्हा नागपूर माहिती (jilha nagpur mahiti)

नागपूर

जिल्हा व प्रशासकीय विभागाचे मुख्यालय : नागपूर

क्षेत्रफळ : ९,८०२ चौ. किमी.

स्थान :
नागपूरचे स्थान देशात मध्यवर्ती व राज्यात पूर्वेकडे आहे.

तालुके : १४
नागपूर शहर, नागपूर ग्रामीण, काटोल, कामठी, कळमेश्वर, कुही, रामटेक, हिंगणा, नरखेड, पारशिवनी, सावनेर, मौदा, उमरेड, भिवापूर.

विस्तार : नागपूरच्या पूर्वेस - भंडारा, दक्षिणेस - चंद्रपूर व पश्चिमेस - वर्धा, वायव्येस - अमरावती जिल्हा, उत्तरेस - मध्य प्रदेशाची सीमा (छिंदवाडा, सिवनी जिल्हे)

लोकसंख्या २००१ ची : २.०५२ मी.

नद्या : कन्हान ही प्रमुख नदी - पेंच, कोलार, नाग, सांड, जांब, वर्धा या अन्य नद्या.

धरणे : पारशिवनी तालुक्यात पेंच नदीवर महाराष्ट्र-मध्य प्रदेश यांचा पेंच प्रकल्प.

पिके : कापूस, गहू, ज्वारी, तेलबिया

फळ : संत्री

महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठ, स्थापना - २०००

औद्योग : वाडी व अंबाझरी येथे युध्दोपयोगी संरक्षण साहित्य निर्मिती कारखाने, कन्हान येथे कागद गिरणी, कामठी येथे मँगेनीज शुद्धीकरण कारखाना, हातमाग व यंत्रमाग, बुटिबोरी येथे आशियातील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत. खापरखेडा, कोराडी येथे औष्णिक प्रकल्प, उमरेड येथे नियोजित अणुविद्युत प्रकल्प.

शैक्षणिक : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर (स्थापना : १९२५)

संस्था : महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ, केंद्रीय कापूर संशोधन संस्था.

पर्यटन स्थळे :
नागपूर - नाग नदीकाठी, महाराष्ट्राची उपराजधानी, राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन येथे भरते. सीताबर्डी, किल्ला, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ, नागपूर शहराच्या स्थापनेस अलिकडेच तीनशे वर्षे पूर्ण झाली. काटोल येथे राष्ट्रीय लिंबू संशोधन केंद्र. पेंच येथील राष्ट्रीय अभयारण्य.

रामटेक - कालिदासाचे 'मेघदूत' येथेच बहरले. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ येथे आहे.

रविवार, २ नोव्हेंबर, २०१४

जिल्हा अमरावती माहिती (amaravati jilha mahiti)

अमरावती

जिल्ह्याचे व प्रशासकीय विभागाचे मुख्यालय : अमरावती
क्षेत्रफळ : १२,२१० चौ. किमी.
महाराष्ट्रातील सहा प्रशासकीय विभागांपैकी एक

तालुके : १४
अमरावती, अचलपूर, अंजनगाव-सुर्जी, चांदूर-रेल्वे, चांदूर बाजार, चिखलदरा, तिवसा, धारणी, दर्यापूर, धामणगाव, नांदगाव-खंडेश्वर, मोर्शी, भातकुली, वरुड

विस्तार : जिल्ह्याच्या पूर्वेस, नागपूर व वर्धा जिल्हा, पश्चिमेस व नैॠत्येस - अकोला, दक्षिणेस - यवतमाळ

लोकसंख्या २००१ ची : ५,४९,५१०

नद्या : तापी, पूर्णा, वर्धा या मुख्य नद्या व त्यांच्या उपनद्या
तापी नदीच्या उपनद्या : गाडगा, काप्रा, सिपना
पूर्णेच्या उपनद्या : चंद्रभागा, शहानूर, पेढी
वर्धेच्या उपनद्या : माडू, चुडामण, वेंबळा, विदर्भा, चारघड, खोलाट

धरण प्रकल्प : वर्धा नदीवरील मोर्शी प्रकल्प पूर्णत्वाच्या प्रतिक्षेत

पिके : ऊस, तूर, कापूस, ज्वारी

फळ : संत्री, मोसंबी

औद्योग : कापसाच्या उत्पादनामुळे जिनिंग व प्रेसिंग उद्योग, कापड गिरण्या.
सातुर्णा येथे औद्योगिक वसाहत.
नांदगाव पेठ येथे औद्योगिक नागरी संकुल.

शिक्षणिक : कर्मयोगी संत गाडगेबाबा विद्यापीठ, अमरावती (१९८३ मध्ये)

पर्यटन स्थळे :
अमरावती -
जिल्हा व प्रशासकीय विभागाचे मुख्यालय, संत गाडगेबाबा विद्यापीठ.
कापसाची प्रमुख बाजारपेठ.
डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांनी कुष्ठरोग्यांसाठी स्थापन केलेले तपोवन.
डॉ. पंजाबराव देशमुख यांची शिवाजी शिक्षण संस्था व श्रुध्दानंद छात्रालय, गाडगेबाबांची समाधी, गुरू हनुमान आखाडा.

चिखलदरा -
थंड हवेचे ठिकाण, विदर्भाचे नंदनवन, येथून जवळच 'बैराट' हे सातपुड्यातील सर्वोच्च शिखर.
चिखलदऱ्यात कॉफीचे मळे फुलू लागले आहेत.
मेळघाट येथे वाघांचे अभयारण्य.

मोर्शी -
तालुक्याचे ठिकाण, रिथपूर येथे चक्रधरस्वामींचे गुरू श्री गोविंदप्रभू यांची समाधी.

यावली -
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्मगाव.

मोझरी -

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा 'गुरुकुंज आश्रम', तुकडोजींची समाधी.

कौंडिण्यपूर -

भगवान श्रीकृष्णांची पत्नी रुक्मिणीदेवी, तसेच नळ-दमयंती आख्यानातील दमयंती यांचे माहेरगाव असा पुरणात उल्लेख.