Advertisement

शुक्रवार, ३१ ऑक्टोबर, २०१४

जिल्हा अकोला माहिती (jilha akola mahiti)

अकोला

स्थान : विदर्भातील अमरावती या प्रशासकीय विभागात.
राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ (धुळे-कोलकाता) अकोला जिल्यातून जातो.

क्षेत्रफळ : ५४३० चौ.कि.मी.

विस्तार : अकोला जिल्ह्याच्या पूर्वेस व उत्तरेस : अमरावती जिल्हा. पश्चिमेस जिल्हा, दक्षिणेस : वाशिम जिल्हा

तालुके : अकोला जिल्ह्यात एकूण ७ तालुके आहेत.
अकोला, बाळापूर, मूर्तिजापूर, पातूर, अकोट, बार्शी-टाकळी, तेल्हारा

एकूण गावे : १००९

नदी : मोर्णा नदीच्या तीरावर अकोला शहर वसले आहे.

धरणे : 'वान-प्रकल्प' (ता. तेल्हारा) प्रमुख धरण.

प्रमुख पिके : खरीप ज्वारी, कापूस, तूर, मूग, गहू, हरभरा. (खरीप ज्वारीच्या उत्पादनात राज्यात आघाडीवर.)

ऊर्जानिर्मिती : पारस (ता. बाळापूर) येथे राष्ट्रीय औष्णिक विद्युत केंद्र.

औद्योगिक : कापसाच्या अधिक उत्पादनामुळे अकोला जिल्ह्यात जिनिंग व प्रेसिंग उद्योग तसेच हातमाग, खादी वस्त्रोद्योग मोठ्या प्रमाणात चालतो.
बाळापूर, अकोट येथे सतरंज्या निर्मितीचा व्यवसाय केंद्रीत झाला आहे.

पर्यटन स्थळे : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे ठिकाण.
नर्नाळा : २७ दरवाजांचा ऐतिहासिक किल्ला, अभयारण्य.
बाळापूर : बाळापूर देवीचे मंदिर, किल्ला, राजा मिर्झा जयसिंगाची छत्री, मन-म्हैस नद्यांचा संगम.
मूर्तिजापूर : मुंबई - कोलकाता रेल्वे मार्गावरील जंक्शन, संत गाडगेबाबांचा आश्रम, सांगावी येथे पूर्णा - उमा संगम.
१ जुलै १९९८ रोजी अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन वाशिम हा नवा जिल्हा तयार झाला.

लोकसंख्या
: १८,१८,६१८ (वर्ष २०११)

साक्षरता प्रमाण : ८७.७५ (वर्ष २०११)

गुरुवार, ३० ऑक्टोबर, २०१४

सर जगदीशचंद्र बोस (jagdishchandra bos)

'वनस्पतींनाही संवेदना असतात', याची जगाला जाणीव करून देणारे महान भारतीय वैज्ञानिक सर जगदीशचंद्र बोस यांचा जन्म ३० नोव्हेंबर १८५८ रोजी तत्कालिन बंगाल प्रांतातील (सध्याच्या बांगलादेशातील) मेमनसिंह जिल्ह्यात झाला. त्यांचे वडील भगवानचंद्र बोस हे फरीदापूर जिल्ह्याचे उपदंडाधिकारी (डेप्युटी मॅजिस्ट्रेट) होते. भारतीय संस्कृती व परंपरा पाळणाऱ्या कुटुंबात त्यांचे बालपण गेले. रामायण व महाभारत या श्रेष्ठ महाकाव्यांचे त्यांच्यावर बालपणापासून संस्कार झाले होते. ही महाकाव्ये त्यांच्या जीवनप्रणालीचे प्रेरणास्रोत होती. सातत्याने कठोर परिश्रम केल्यास अपयशाचे परिवर्तन यशामध्ये होऊ शकते, यावर त्यांची वाढ श्रद्धा होती.
कोलकाता (कलकत्ता) येथील सेंट झेविअर्स शाळेत त्यांचे प्रारंभिक शिक्षण झाले. या शाळेत बहुसंख्य विद्यार्थी ब्रिटिश व इंग्रज प्रशासकीय सेवेतील भारतीय अधिकाऱ्यांची मुले होती. जगदीशचंद्र हे ग्रामीण भागातील असल्यामुळे इतर मुले या मुलाची थट्टा व छळ करीत असत. सुरुवातीस बोस यांनी त्यांची ही मस्ती व त्रास सहन केला. परंतु या वागण्यामुळे बोस यांच्या सहनशीलतेचा कडेलोट झाला, तेव्हा त्यांनी त्या शहरी मुलांपैकी एका आडदांड मुलाला चांगलेच चोपले व खाली पाडले. त्यांच्या या प्रतिकारामुळे बरेच विद्यार्थी त्यांचे मित्र बनले व त्यांना मान देऊ लागले. या प्रकारानंतर मात्र त्यांना त्रास देण्याची हिंमत कोणी दाखवली नाही.
बोस यांचे महाविद्यालयीन शिक्षण कलकत्ता येथील महाविद्यालयातच झाले. नंतर वैद्यकशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी ते इंग्लंडला गेले. तेथील वास्तव्यात पदार्थविज्ञानाचेनामांकित तज्ज्ञ लॉर्ड रॅले यांचा त्यांच्यावर इतका प्रभाव पडला की वैद्यकशास्त्र सोडून पदार्थविज्ञानाचेच अध्ययन त्यांनी सुरू केले. त्यासाठी केंब्रिजच्या ख्राईस्ट चर्च महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला. इ.स. १८८५ साली त्यांनीलंडन विद्यापीठाची डॉक्टर ऑफ सायन्स (D.Sc.) ही पदवी प्राप्त केली. याबरोबरच सृष्टिविज्ञान विषयातील ट्रायपॉस (Tripos) ही पदवी मिळवून ते भारतात परतले.
भारतात परतल्यानंतर ते कलकत्ता येथील प्रेसिडेन्सी महाविद्यालयात पदार्थविज्ञानाचे प्राध्यापक म्हणून कार्य करू लागले. हे उच्च पद धारण करणारे ते पहिले भारतीय होते. या उच्च पदावर काम सुरू केल्यानंतर त्यांना समजले की, ब्रिटिश प्राध्यापकांपेक्षा आपल्याला कमी वेतन देण्यात येत आहे. या अन्यायाचा प्रतिकार म्हणून, जरी काम केले तरी पगार स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला.
अशा प्रकारे, अन्यायाविरुद्ध त्यांनी आवाज उठवणे हा सत्याग्रहाचाच एक प्रकार होता. त्यांच्या या सत्याग्रहाचा परिणाम होऊन शासनाने शेवटी त्यांची मागणी पूर्ण केली. त्यांना थकबाकीसह पूर्ण पगार देण्यात आला. महात्मा गांधींनी भारतात येऊन सत्याग्रहाच्या माध्यमातून अन्यायाचा प्रतिकार करता येतो याची जाणीव करून दिली होती. परंतु बोस यांनी त्यांच्याही अगोदर शांततापूर्ण मार्गाने अन्यायाच्या विरोधाचा हा प्रयोग यशस्वी केला होता.
प्रकाशाचा किरण स्फटिकातून जाताना मार्ग बदलतो, म्हणजेच त्याचे अपवर्तन (Refraction) होते. काही स्फटिकांतून दोन अपवर्तित किरणे आढळतात. या चमत्कृतीस 'दुहेरी अपवर्तन' म्हणतात. कोलकाता येथे परत आल्यानंतर बोस यांनी या दुहेरी अपवर्तनावर संशोधन सुरू केले. जर्नल ऑफ एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल या संशोधन नियतकालिकात या संदर्भातील त्यांचा पहिला शोधनिबंध प्रकाशित झाला. यानंतर त्यांनी 'विद्युत-चुंबकीय तरंग' या विषयावरील संशोधनाला सुरुवार केली. १ मिमी ते १ सेमी तरंगलांबी (Wavelength) असलेल्या विद्युत-चुंबकीय तरंगाची निर्मिती, संप्रेषण व ग्रहणक्षमता हे त्यांचे संशोधन क्षेत्र होते. त्या काळात अशा प्रकारच्या तरंगलांबीच्या क्षेत्राचे संशोधन कार्य हे अतिशय जटिल व गुंतागुंतीचे मानले जाई.
या कामासाठी त्यांना महाविद्यालयाकडून कोणतेही साधन, साहाय्य वा अन्य मदत मिळाली नाही. असे असूनही, स्थानिक मनुष्यबळाची मदत घेऊन, त्यांना मार्गदर्शन करून तीन महिन्यांत आवश्यक ती उपकरणे त्यांनी बनवून घेतली, त्यासाठी लागणारा खर्च त्यांनी स्वतः सोसला व ते संशोधनात गढून गेले. पदार्थांची अंतर्गत संरचना समजावी यासाठी प्रथमच त्यांनी सूक्ष्म तरंगांचा (Micro Waves) वापर केला व यात त्यांना यशही आले. त्यांनी बनवलेले हे उपकरण आज 'तरंग मार्गदर्शक' (wave Guide) या नावाने ओळखले जाते. लघुतरंगांच्या अर्धप्रकाशीय गुणधर्मासंबंधात. अनेक प्रयोग त्यांनी केले व इ.स. १८९५ साली या प्रयोगांच्या आधारे रेडिओ संसूचकांच्या प्रारंभिक रूप असलेल्या सुसंगतीत सुधारणा घडवून आणली. त्यामुळे स्थायू अवस्था पदार्थविज्ञानाच्या (Solid-state Physics) विकासाला चालना मिळाली.
बिनतारी संदेशवहनाच्या (Wireless Telegraphy) संशोधनाशी नाव निगडित असलेले इटलीतील प्रसिद्ध संशोधक व विद्युत अभियंते मार्कोनी यांनी या क्षेत्रात काम करण्यापूर्वीच बोस यांनी काम केले होते आणि यशही प्राप्त केले होते. इ.स. १८९५ मध्येच प्रा. बोस यांनी रेडिओ तरंग पक्क्या भिंतीतून परावर्तित करता येऊ शकतात हे जाहीरपणे प्रयोग करून दाखवून दिले. त्यामुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. लंडन येथील रॉयल इन्स्टिट्युटमध्ये लॉर्ड केल्विन व अन्य वैज्ञानिक यांच्या उपस्थितीत त्यांनी या प्रयोगाचे प्रात्यक्षिक पुन्हा दाखवले. नंतर या क्षेत्रातील प्रयोग थांबवून आपले खूप वर्षांनी मार्कोनी यांनी बिनतारी संदेशासंबंधित एकस्व अधिकार (पेटण्ट - Patent) प्राप्त केले. अनेक विदेशी ग्रंथांतून आज बिनतारी संदेश यंत्रणेचा संशोधक म्हणून मार्कोनीची प्रशंसा केली जाते; पण खरे श्रेय मात्र बोस यांनाच आहे.
इंग्रजांच्या काळात संशोधन हे भारतीय वैज्ञानिकांसाठी फारसे उमेदीचे काम नव्हते. उपकरणांची कमतरता होती, सोयी-सुविधा असलेल्या प्रयोगशाळांचा देखील अभाव होता. संदर्भसाहित्य व ग्रंथालायेही उपलब्ध नव्हती. शासनही प्रोत्साहन देत नसे. मान्यतेसाठी लंडनकडे डोळे लावून बसावे लागे. बोस यांच्या बौद्धिक क्षमतांमुळे अनेक इंग्रजी शास्त्रज्ञ प्रभावित झाले होते. लॉर्ड केल्विन व सर ऑलिव्हर लॉज यांना तर बोस यांच्याबद्दल विलक्षण आदर होता. त्यांनी असेही सुचवले होते की, बोस यांनी लंडन येथेच स्थायिक व्हावे व संशोधन करावे. परंतु स्वतःच्या देशावर प्रेम असणाऱ्या बोस यांनी हा प्रस्ताव स्वीकारला नाही.
शतकाच्या अखेरच्या सुमारास बोस यांनी वनस्पती शारीरक्रियाशास्त्र (Plant Physiology) या विषयाच्या संशोधनावर आपले लक्ष केंद्रित केले. वनस्पती उत्तेजित झाल्यास त्यांच्यात सूक्ष्म हालचाली होतात, या बाबीचा अभ्यास करण्यासाठी बोस यांनी कल्पक पद्धत शोधून काढली. त्यांनी हे सिद्ध केले. वनस्पती उत्तेजित झाल्यास त्यांच्यात सूक्ष्म हालचाली होतात, या बाबीचा अभ्यास करण्यासाठी बोस यांनी कल्पक पद्धत शोधून काढली. त्यांनी हे सिध्द केले की, वनस्पतींना संवेदना असतात. माणसाप्रमाणेच सुख-दु:खाच्या प्रतिक्रिया त्या व्यक्त करू शकतात. मात्र माणून किंवा पशू यांच्याप्रमाणे आवाजाच्या माध्यमातून  वनस्पती वेदना व आनंद व्यक्त करू शकत नाहीत; पण फुलून येऊन, कोमेजून वा वाळून त्या आपल्या भावना व्यक्त करतात. तसेच, अन्य सजीवांप्रमाणेच वनस्पतीही श्वासोच्छवास करतात.
१० मे, १९०१ रोजी लंडन येथील रॉयल सोसायटीचे सभागृह वैज्ञानिकांच्या उपस्थितीने गच्च भरले होते. जगदीशचंद्र बोस तेथे आपल्या एका महत्त्वपूर्ण प्रयोगाचे प्रात्यक्षिक सादर करणार होते. त्यांनी वनस्पतींची संवेदनशीलता तपासणारे 'क्रेस्कोग्राफ' या नावाचे अतिशय नाजूक उपकरण बनवले होते. ते उपकरण म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण असा शोध होता. एका रोपट्याला ते उपकरण जोडले होते. नंतर ते रोपटे ब्रोमाइड या विषारी द्रव्याच्या पसरट भांड्यात बुडवण्यात आले. त्यामुळे वनस्पतीच्या सूक्ष्म स्पंदनांचे प्रक्षेपण वर्धित स्वरूपात पडद्यावर दिसत होते. थोड्या वेळाने त्या रोपट्याचे स्पंदन अनियमित होत होत अचानक थांबले. रोपटे जणू काही विषाला बळी पडले होते. वातावरण आश्चर्याने स्तब्ध झाले होते.
क्रेस्कोग्राफ : वनस्पतींची वाढ नोंदवणारे व सूक्ष्मातीसूक्ष्म हालचाल कोट्यांशपटींनी वर्धित करून दाखवणारे नाजूक उपकरण.
या प्रयोगामुळे वनस्पती शरीरक्रिया जाणणाऱ्या अनेक शास्त्रज्ञांना मुळीच आनंद झाला नाही. बोस हे पदार्थविज्ञान शास्त्रज्ञ असून, विज्ञानाच्या अन्य क्षेत्रांवर त्यांनी अतिक्रमण करण्याचे धाडस केले, हे त्या शास्त्रज्ञांच्या रागामागील व आनंदित न होण्यामागील कारण होते. वनस्पती शरीरक्रिया शास्त्रातील वैज्ञानिकांनी प्रतिपादित केलेल्या गोष्टी चूक असल्याचे बोस यांनी सिद्ध केले होते. सभागृहातील वैज्ञानिक यामुळे इतके विचलित व प्रक्षुब्ध झाले की, रॉयल सोसायटीतर्फे बोस यांचे भाषण प्रकाशित करण्यास त्यांनी विरोध केला. परंतु खोटा पडेल इतका आपला प्रयोग तकलादू नाही, याबद्दल बोस यांना आत्मविश्वास होता. दोन वर्षे अथक परिश्रम करून त्यांनी एक प्रबंध (मॉनोग्राफ - Monograph) प्रकाशित केला. प्रबंधाचे शीर्षक होते 'सजीव व निर्जीव यांच्यातील प्रतिसाद प्रक्रिया' (Response in the Living and Non-living). आपला प्रयोग अचूक असून प्रयोगाचे फलित योग्यच आहे, हे सत्य स्वीकारण्यास पर्याय नाही; हे रॉयल सोसायटीला त्यांनी पटवून दिले. जे भाषण सुरुवातीस प्रकाशित झाले नाही, ते आता प्रकाशित देले गेले व जगभर वितरित करण्यात आले. बोस यांची शास्त्रज्ञ म्हणून जगभर ख्याती पसरली. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. इ.स. १९२० साली रॉयल सोसायटीचे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. या पदासाठी निवड झालेले ते पहिले भारतीय शास्त्रज्ञ ठरले. त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचे मोल लक्षात घेऊन ब्रिटिश शासनाने इ.स. १९१७ मध्ये त्यांना 'सर' या किताबाने सन्मानित केले. तेव्हापासून ते 'सर जगदीशचंद्र बोस' या नावाने ओळखले जाऊ लागले.
बोस यांना जीवशास्त्रज्ञ म्हणून आता ओळखले जाऊ लागले. त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल प्रत्येक भारतीय सदैव ऋणी राहील. पाश्चिमात्यांनी मान्यता दिल्यानंतरच त्यांच्या देशातील लोकांनी बोस यांच्या संशोधनास मान्यता दिली व त्यांचे श्रेष्ठत्व ताणले. ३० नोव्हेंबर, १९१७ रोजी बोस यांनी 'बोस संशोधन संस्था' देशाला समर्पित केली.
कविश्रेष्ठ रवींद्रनाथ टागोर हे बोस यांचे मित्र होते. त्या काळात पाश्चिमात्यांना टागोरांविषयी माहिती नव्हती. बोस यांनी टागोरांच्या साहित्याचे भाषांतर करून ते प्रसिध्द केले. त्यामुळे टागोरांची प्रतिभा ज्ञात झाली. त्यांचे समकालीन भारतीय वैज्ञानिक सी.व्ही. रामन यांच्यापेक्षा बोस ३० वर्षांनी मोठे होते. योगायोग असा की, रामन ज्या वित्तीय प्रशासकीय सेवेच्या परीक्षेस बसले होते, त्या परीक्षेतील पदार्थविज्ञान विषयाची प्रश्नपत्रिका बोस यांनी तयार केली होती. आपल्या मृत्यूच्या एक दिवस आधी बोस यांनी तयार केली होती. आपल्या मृत्यूच्या एक दिवस आधी बोस यांनी बोस संशोधन संस्थेच्या निदेशकास सांगितले होते की, मृत्यूनंतर माझी उरलीसुरली संपत्ती विकावी व त्यातून मिळणारे धन संशोधन व सामाजिक कार्यासाठी वापरले जावे.
२३ नोव्हेंबर, १९१७ रोजी बिहारमधील गिरिडीह येथे बोस यांची प्राणज्योत मालवली. 'सजीव व निर्जीव यांच्यातील प्रतिसाद प्रक्रिया' (इ.स. १९०२) व 'वनस्पतींतील चेता यंत्रणा' (इ.स. १९२६) हे त्यांचे दोन उल्लेखनीय ग्रंथ होते. त्यांनी स्थापन केलेली 'बोस संशोधन संस्था' आजही त्यांच्या आदर्शांनुसार काम करत आहे; अनेक संशोधन क्षेत्रांत हे कार्य चालू आहे. बोस संशोधन संस्था सर जगदीशचंद्र बोस यांचे नाव उज्ज्वल करत असून यशाच्या उच्चतम शिखरांवर आरूढ आहे. दिवसेंदिवस या संस्थेच्या नावलौकिकात वाढ होत आहे.

सोमवार, २७ ऑक्टोबर, २०१४

क्रियापद, कर्ता व कर्म (Kriyapad, karta and karm)

क्रियापद

वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात; म्हणून 'करतो, शिकते, खेळतात' ही क्रियापदे आहेत.
१) यज्ञेश अभ्यास करतो.
२) ओजस्वी व्याकरण शिकते.
३) बाळू व जयंत मैदानात खेळतात.

वरील वाक्यांतील 'करतो, शिकते, खेळतात' या अधोरेखित शब्दांमधून कोणती ना कोणती क्रिया व्यक्त होते.
उदाहरणार्थ -

१) करतो - करण्याची क्रिया
२) शिकते - शिकण्याची क्रिया
३) खेळतात - खेळण्याची क्रिया

जर 'करतो, शिकते, खेळतात' हे क्रियावाचक शब्द आहेत.

क्रियावाचक शब्द वाक्यांतून काढून टाकले तर काय होईल?
१) यज्ञेश अभ्यास ............
२) ओजस्वी व्याकरण ...........
३) बाळू व जयंत मैदानात ..........

म्हणजे शब्द वाक्यातून काढून टाकले, तर वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही.

कर्ता व कर्म


क्रियापदाने दाखवलेली क्रिया जो करतो त्याला कर्ता म्हणतात व क्रिया ज्यावर घडते त्याला कर्म म्हणतात.
क्रियापद हा वाक्यातील मुख शब्द असतो; कारण त्याशिवाय वक्याचा अर्थ सहसा पूर्ण होत नाही.

राजेश पुस्तक वाचतो
वरील वाक्यात वाचतो हे क्रियापद आहे.
वाचतो या क्रियापदात वाचण्याची क्रिया आहे.

वाचण्याची क्रिया कोण करतो?
- राजेश
वाचण्याची क्रिया कोणावर घडते?
- पुस्तकावर

म्हणजे -
राजेश - कर्ता
पुस्तक - कर्म
वाचतो - क्रियापद

बुधवार, २२ ऑक्टोबर, २०१४

श्रीनिवास रामानुजन

      रामानुजन यांना कसेबसे प्राथमिक शाळेत दाखल करण्यात आले. आपल्या वर्गात ते सर्वात हुशार विद्यार्थी होते. गणितावर त्यांचे कल्पनातीत प्रभुत्व होते. ते मनातच गणित करून उत्तर शोधात. रामानुजन विलक्षण प्रतिभाशाली होते. कधी कधी ते असे प्रश्न विचारात की, त्यांचे शिक्षकही कोड्यात पडत. संध्याकाळी शाळा सुटल्यावर इतर मुले खेळत असत, तेव्हा ते पाटी व खडू घेऊन प्रश्न सोडवण्यात मग्न होत.
    नोव्हेंबर, १८९७ मध्ये, दहा वर्षांचे असताना संपूर्ण तंजावर जिल्ह्यात प्राथमिक शाळेच्या परीक्षेत ते प्रथम आले. यामुळे कुंभकोणम हायस्कूलमध्ये मोफत शिक्षण मिळण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला. माध्यमिक शाळेत देखील गणिताच्या सर्व परीक्षांत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला व अनेक पारितोषिकेही मिळवली. त्यांच्या या यशामुळे त्यांचे शिक्षक प्रभावित झाले.
    रामानुजन यांच्या शेजारी महाविद्यालयात शिकणारा एक मुलगा राहत होता. एकदा रामानुजन यांनी त्याचे गणिताचे पाठ्यपुस्तक मागितले. त्या मुलाने रामानुजनना पुस्तक तर दिले; पण शाळेतल्या विद्यार्थ्याला महाविद्यालयाच्या पुस्तकाची काय गरज, याचे त्याला नवल वाटले. रामानुजनने पुस्तकातील सर्व प्रश्न सोडवले, हे पाहून तर त्याला फारच आश्चर्य वाटले. नंतर त्याला गणितात कोणतीही शंका आली की, तो रामानुजन यांना विचारात असे. आता तो रामानुजनसाठी महाविद्यालयातून गणितविषयी आणखी इतर पुस्तकेही आणू लागला. वयाच्या तेराव्या वर्षी रामानुजनने ग्रंथालयातील त्रिकोणमितीवर (ट्रिग्नॉमिट्री) एक पुस्तक वाचले. पुस्तकातील प्रमेये त्यांनी आपल्या वहीत सोडवली. १५ व्या वर्षी त्यांनी जॉर्ज शुब्रिज कार यांच्या 'विशुद्ध व उपयोजित गणितातील प्रारंभिक निष्कर्षांचा सारांश' (सिनॉप्सिस ऑफ एलिमेंटरी रिझल्ट्स इन प्युअर अँड अप्लाइड मॅथेमॅटिक्स) या ग्रंथाची दोन खंडांत उपलब्ध असलेली (१८८० - ८६) प्रत मिळाले. कार यांच्या पुस्तकातील उत्तरे आपल्या उत्तराशी त्यांनी ताडून पहिली. स्वतःची प्रमेये व मते विकसित करून ते कार यांच्याही पुढे गेले.
    इ.स. १९३० मध्ये, १६ वर्षांचे असताना त्यांनी मॅट्रिक परिक्षा उत्तीर्ण केली. गणितात त्यांनी प्रथेम श्रेणी प्राप्त केली व त्यांना शिष्यवृत्तीही मिळाली. पुढे त्यांनी शासकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. महाविद्यालयातही ते गणिते सोडवण्यातच तल्लीन होत व इतर विषयांकडे दुर्लक्ष करीत. याचा परिणाम असा झाला की, गणितात त्यंना पूर्ण गुण मिळाले; पण इतर विषयांत ते अनुत्तीर्ण झाले. त्यांची शिष्यवृत्ती बंद झाली. यामुळे त्यांच्या वडिलांना वाईट वाटले. परिणामी, त्यांना महाविद्यालय सोडावे लागले. अशा प्रकारे इ.स. १९०६ साली त्यांचे औपचारिक शिक्षण समाप्त झाले.
    रामानुजनना असणारी गणिताबद्दलची ओढ पाहून रामानुजन यांचे वडील चिंतित झाले होते. रामानुजनना आपल्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी २२ व्या वर्षी त्यांचे लग्न लावून देण्यात आले. त्यावेळी त्यांच्या पत्नी जानकी यांचे वय नऊ वर्षांचे होते. रामानुजन यांनी जबाबदारी वाढल्याने नोकरी शोधण्यास सुरुवात केली. या कामी त्यांना यश मिळाले नाही; तरी शेवटी गणितच त्यांच्या उपयोगी पडले. इ.स. १९०३ पासून रामानुजन यांनी आपल्या वहीत गणिते सोडवण्यास सुरुवात केली होती. इ.स. १९१० पर्यंत त्यांनी केलेल्या संशोधनावरील कामांच्या तपशिलाने दोन मोठ्या वह्या पूर्ण भरल्या. आपल्या वह्या घेऊन ते भारतीय गणित मंडळाचे (इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटी) संस्थापक पी. रामास्वामी अय्यर यांच्याकडे गेले. या वह्या पाहून रामास्वामी अतिशय प्रभावित झाले. त्यांनी रामानुजन यांना प्रेसिडेन्सी महाविद्यालय, मद्रास (चेन्नई) येथील गणिताच्या प्राध्यापकांच्या नावे एक पत्र दिले. सुदैवाने त्या प्राध्यापकांनी यापूर्वी त्यांच्या महाविद्यालयात शिकवले होते. रामानुजन त्यांना भेटले तेव्हा, त्यांनी रामानुजनना पटकन ओळखले. नेल्लोराचे जिल्हाधिकारी (कलेक्टर) रामाराव यांच्या नावे एक शिफारस पत्र त्यांनी रामानुजन यांना दिले. व्यक्तिशः रामाराव यांना गणिताची खूप आवड होती. त्यामुळे त्यांनी ठरवले की, रामानुजन यांना मद्रास येथे महालेखापालांच्या कार्यालयात नोकरी मिळावी. कालांतराने त्यांना मद्रासच्या पोर्ट ट्रस्टच्या लेखा विभागात लिपिक म्हणून नोकरी मिळाली. त्यावेळी त्यांचा महिन्याचा पगार ३० रु. होता. त्यामुळे त्यांच्या आर्थिक स्थितीत थोडीफार सुधारणा झाली.
    कार्यालयातून वेळ मिळाला की ते संशोधनपर लेख लिहीत. त्यांचे ते लेख इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटीच्या नियतकालिकात प्रकाशित झाले. मद्रास येथील गणिताच्या क्षेत्रात त्यांना प्रसिद्धी मिळाली. लवकरच काही प्राध्यापकांना व शिक्षणतज्ज्ञांना त्यांचे काम व बैद्धिक कैशल्य ज्ञात झाले. त्यांच्या शिफारशीमुळे १ मे, १९१३ पासून गणितातील आपले संशोधन चालू ठेवण्यासाठी त्यांना मद्रास विद्यापीठाकडून मासिक ७५ रु. शिष्यवृत्ती देण्यात आली. तोपर्यंत त्यांच्याकडे कोणत्याही विद्यापीठाची कोणतीच पदवी नव्हती. काही हितचिंतकांच्या सल्ल्यानुसार त्यांनी काही महान गणितज्ञांकडून मार्गदर्शन घेण्याचा निर्णय घेतला. त्या काळी इंग्लंड हे गणिताचे केंद्र मानले जाई. रामानुजन यांनी आपली १२० प्रमेये व सूत्रे (थिअरम्स व फॉर्म्युले) केंब्रिज विद्यापीठाच्या ट्रिनिप्टी महाविद्यालयातील फेलो, प्रसिद्ध गणितज्ञ प्रा. गॉडफ्रे एच. हार्डी यांना पाठवली. पोस्टाने मिळालेल्या या वह्या न्याहाळल्यावर त्यांनी आपले सहकारी प्राध्यापक लिटलवुड यांच्याशी याविषयी चर्चा केली. या वह्या लिहिणाऱ्या लेखकाची प्रतिभा त्यांना जाणवली. लवकरच हार्डी व रामानुजन यांच्यात पत्रव्यवहार सुरू झाला. हार्डी यांनी रामानुजन यांच्या इंग्लंड दौऱ्याची व्यवस्था केली. याच दरम्यान केंब्रिज विद्यापीठाचे प्रा.ई. एच. नेविले मद्रास विद्यापीठाच्या दौऱ्यावर आले. हार्डी यांनी त्यांना रामानुजन यांची भेट घेऊन त्यांना इंग्लंडला येण्यास तयार करण्यास सांगितले. स्थानिक मित्र आणि हितचिंतक रामानुजन यांना इंग्लंड दौऱ्यासाठी सर्व प्रकारची मदत करण्यास तयार होते.
    अशा संयुक्त प्रयत्नांमुळे मद्रास विद्यापीठ रामानुजन यांना दोन वर्षांसाठी २५० पौंडांची शिष्यवृत्ती देण्यास राजी झाले. हार्डी यांनी रामानुजन यांचा प्रवास खर्च व इंग्लंड मधील वास्तव्याचा खर्च यांची जबाबदारी घेतली होती. परंतु त्यांच्या आई-वडिलांनी त्यांच्या या निर्णयावर आक्षेप घेतला. परंपरावादी वैष्णव कुटुंबातील मुलाने समुद्र ओलांडण्यास धर्माची अनुमती नव्हती. अखेरीस, हितचिंतकांनी समजावून सांगितल्यामुळे रामानुजन यांचे पालक सहमत झाले व त्यांना परदेशी जाण्याची परवानगी दिली. १७ एप्रिल, १९१४ रोजी ते इंग्लंडला पोहोचले. नंतर हार्डी व लिटलवुड यांच्या मार्गदर्शनाखाली रामानुजन यांनी पद्धतशीर अभ्यास व संशोधनास सुरुवात केली. याच दरम्यान पहिल्या जागतिक महायुद्धाला सुरुवात झाली. लिटलवुड युद्धक्षेत्रावर गेल्या नंतर प्राध्यापक हार्डी यांनी त्यांची देखभाल करण्याचे काम सांभाळले व मार्गदर्शन केले.
    हिवाळा सुरू झाल्यावर रामानुजन यांना इंग्लंडची कडाक्याची थंडी सहन करणे कठीण झाले. ते रुढीप्रिय ब्राह्यण व कट्टर शाकाहारी असल्याने स्वतःचे जेवण स्वतः बनवत. त्यांना एकटेपणाही जाणवू लागला. हार्डी यांना त्यांच्यात प्रतिभाशाली गणितज्ञ दिसला. केवळ त्यांची इच्छा आणि उत्तम काळजी यामुळे रामानुजन इंग्लंडमध्ये पाच वर्षे राहिले. हार्डी त्यांचे खरे मित्र, मार्गदर्शक व तत्त्वज्ञ होते. त्यानंतर काही काळाने हार्डी यांनी मद्रास विद्यापीठास एक पत्र लिहिले. त्यात त्यांनी लिहिले की, रामानुजन हे फार मोठे गणितज्ञ आहेत आणि इतकी प्रतिभावान व्यक्ती त्यांना पूर्वी कधी भेटली नाही. त्यांचे प्रशंसापत्र मिळाल्यावर मद्रास विद्यापीठाने रामानुजन यांची दोन वर्षांसाठी असणारी शिष्यवृत्ती पाच वर्षांपर्यंत म्हणजे मार्च, १९१९ पर्यंत वाढवली. केवळ मॅट्रिक झालेल्या रामानुजन यांना इ.स. १९१६ साली बी.ए. पदवी प्रदान करण्यात आली.
    इंग्लंडच्या पाच वर्षांच्या वास्तव्यात त्यांचे २५ शोधनिबंध प्रकाशित केले गेले. यामुळे गणिताच्या विश्वात ते लोकप्रिय झाले. रामानुजनना त्या काळातील महान गणितज्ञांमधील एक मानण्यात येई. ऑक्टोबर, १९१८ मध्ये लंडनच्या रॉयल सोसायटीने त्यांना फेलो करून घेतले. हा सन्मान मिळवणारे ते दुसरे भारतीय होते. फेब्रुवारी १९१८ साली नौदल अभियंता आरदेशजी यांना ट्रिनीटी महाविद्यालयाकडून असा सन्मान मिळाला होता. ते पहिले सन्मानित भारतीय होते.
    इ.स. १९१७ साली रामानुजन आजारी झाले. त्यांना एका इस्पितळात दाखल करण्यात आले. प्रारंभिक तपासण्यांत आजार टी.बी.चा असल्याचे वाटले; परंतु नंतर समजले की, पोषणमूल्ये नसलेला आहार व जीवनसत्त्वांची कमतरता यामुळे ते आजारी झाले. डॉक्टरांच्या मते, त्यांच्या प्रकृतीला कोरडे हवामानाच अनुकूल असल्याने त्यांनी भाटतात जावे. शेवटी मार्च, १९१९ मध्ये ते भारतात परतले. मित्र व हितचिंतकांनी उपचार करूनही २६ एप्रिल, १९२० रोजी त्यांचे कुंभकोणम येथे अकाली निधन झाले. एक उज्ज्वल तारा क्षितिजावर अचानकच निखळला. त्यावेळी त्यांचे वय केवळ ३२ वर्षांचे होते. गणितज्ञांकडून त्यांना असामान्य व विलक्षण प्रतिभावंतांसारखी प्रतिष्ठा मिळाली, की जी केवळ स्वीस गणितज्ञ लियोनहार्ड यूलर (इ.स. १७०७-८३) व जर्मन गणितज्ञ कार्ल जैकोबी (इ.स. १८०४-५१) यांच्याशिवाय कोणाला मिळाली नाही.
    जाडजूड अशा तीन वह्यांमध्ये असणारे गणितातील त्यांचे संशोधन कार्य आज 'रामानुजन्स नोटबुक्स' या नावाने ओळखले जाते. त्यांचे हे साधन नंतर तर प्रगाढ अभ्यासाचा विषय ठरले. इ.स. १९२७ मध्ये केंब्रिज विद्यापीठाने या संशोधन कार्याचे हार्डी यांच्याकडून संपादन करवून घेऊन ते प्रकाशित केले. त्यांचे काही संशोधन अजूनही अप्रकाशित आहे. रामानुजन यांच्या जन्मशताब्दीच्या वेळी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रीसर्च, मुंबई यांच्या गणित विभागाने त्यांच्या अनेक कृती संपादित व प्रकाशित केल्या. त्यांची एक वही गहाळ झाली होती. नंतर ती प्रा. जॉर्ज अॅन्र्डूज यांना सापडली. ते अमेरिकेत संशोधन कार्य करत आहेत व तेथेच ते संपादित प्रकाशित करू इच्छित आहेत.
    विद्यापीठात त्यांनी केलेल संशोधन, संस्थांना दिलेली अमूल्य सेवा व गणिती विश्वाला दिलेले संशोधनासंबंधीचे योगदान यासाठी केंब्रिज विद्यापीठ व ट्रिनीटी महाविद्यालय यांनी या विश्वप्रसिद्ध गणितज्ञाच्या पत्नी जानकी अम्मा यांना इ.स. १९८८ साली २००० पौंड वार्षिक निवृत्तिवेतन देण्याचा निर्णय घेतला.गणितज्ञ म्हणून प्रसिद्धीस पावलेले महान भारतीय वैज्ञानिक श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म २२ डिसेंबर, १८८७ रोजी तमिळनाडूच्या तंजावर जिल्ह्यात कुंभकोणम् जवळील इरोड नावाच्या छोट्याशा गावात झाला. त्यांचे वडील कुप्पुस्वामी श्रीनिवास एका गरीब व परंपराप्रिय अय्यंगार ब्राह्यण परिवारातील होते. ते एका स्थानिक व्यापाऱ्याकडे वर्धवेळ लिपिक म्हणून काम करीत. त्यांची आई कोमलतम्मा विनयशील, आचारसंपन्न व धार्मिक विचारांची होती. कुटुंबाची आर्थिक स्थिती इतकी वाईट होती की, एका अपत्याचे पालनपोषणही करणे त्यांना अवघड होते.

बुधवार, १५ ऑक्टोबर, २०१४

दिवाळी

१) गोवत्स व्दादशी
गायीच्या पूजनाव्दारे तिच्या सात्त्विक गुणांचा स्वीकार करणे. यालाच वसुबारस असेही म्हणतात या दिवशी गाय-गोऱ्या ला गुळ भाकर खाऊ घालतात.
२) धनत्रयोदशी
संध्याकाळी दिव्यामध्ये धने, मुंग आणि तेल टाकून दिवे लावतात. धने - धनवान, मुंग - नवीन धान्य म्हणून धन आणि धान्याची त्या घरात भरभराट राहते. एखादी नवीन वस्तू किंवा दागिने यांची हळद, कुंकू, अक्षदा, फुले वाहून पूजा करतात. त्यानंतर धने आणि गुळ याचा प्रसाद वाटतात.
३) नरक चतुर्दशी
पहाटेस लवकर उठून जिकडे तिकडे दिवे लावतात. नंतर घरातील सर्व लहानथोर मंडळी स्नान करतात. स्नान आटोपताच डाव्या पायाने नरकासुर म्हणून करांटे फोडतात. लहान मुले स्नान करीत असताना फटाके उडविले जातात. इष्टमित्रांसह उत्तम प्रकारचा फराळ करतात. भोजन झाल्यावर करमणूक करून सर्व दिवस आनंदात घालवितात. रात्री दिवे लावून आरास करतात.
४) लक्ष्मीपूजन
श्रीलक्ष्मी ही ऐश्वर्य-वैभव-समृद्धीची अधिष्ठात्री देवता आहे. ती संपत्ती-स्वरूप आहे.
श्रीलक्ष्मी ही आदिशक्ती आहे. तिचे रूप लक्ष वेधून घेणारे, आकर्षित करणारे, आल्हाद देणारे म्हणून तिला 'लक्ष्मी' म्हटले आहे. श्रीलक्ष्मीचे पूजन केल्याने दैन्य, दारिद्र्य दूर होते. ऐश्वर्य, वैभव, श्रीमंती, सुखशांती घरात येते. धंदा-व्यवसायात भरभराट होते.
त्यासाठी श्रीलक्ष्मीपूजन घरात, दुकानात, पेढीवर, कचेरीत, कारखान्यात व बँकेत भक्तिभावे करतात. आश्विन कृष्णपक्ष अमावस्येला दीपावलीच्या रात्री श्रीलक्ष्मी-पूजन सर्वत्र मोठ्या श्रद्धेने केले जाते. तिच्या कृपेने यथोच्छित धनसंपदा प्राप्त होते. घरात लक्ष्मी अखंड नांदते, असे शास्त्रपुराणे सांगतात.
५) बलिप्रतिपदा दिवाळी पाडवा अभ्यंगस्नानअत्यंत दानी असणाऱ्या बळीराजाची आठवण करणे. हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. या दिवशी बलीचे स्त्रीसह चित्र काढून त्यांची पूजा करतात. विक्रमसंवत सुरू असल्यामुळे व्यापारी लोक नवीन वर्षारंभ समजतात. आणि नवीन कीर्दखतावणी सुरू करतात.
६) भाऊबीज
भाऊबीजेला संध्याकाळी बहिणी चंद्राची पूजा करतात व भावाच्या आयुष्यासाठी उपवास करतात. या दिवशी बहिणीकडून ओवाळून घेऊन ओवाळणी घालावी. व्देष आणि असूया नष्ट करून वात्सल्यभाव जागृत करणे.

मंगळवार, १४ ऑक्टोबर, २०१४

सारांशलेखन

पुस्तकासारखा मित्र नाही असे म्हणतात. इतर मित्र आहेत, पण ते कधी रागावतात, कधी चिडतात तर कधी चेष्टा करतात. कधी वेळेच्या अभावी उपयोगी पडत ना
पुस्तकांचे पुष्कळ प्रकार असतात. काही पुस्तके अल्पायुषी तर काही दीर्घायुषी असतात. त्यांचे आयुष्य त्यांच्यामधील विचारांवर अवलंबून असते. विचार जितके स्थायी, तितकी पुस्तके स्थायी. वर्तमानपत्राचे आयुष्य एक दिवस. सकाळी उत्साहाने व आतुरतेने आपण ते वाचतो. पण त्याचे पारायण करत नाही. मासिकाचे आयुष्य एक महिना. परंतु, काही पुस्तके सदासर्वकाळ बहुमोल असून तप्त मनाला समाधान देतात. भगवद्गीरा, बायबल, कुरण, वेद वगैरे ग्रंथ ह्या प्रतीचे होत.

सारांश :
माणसांच्या सेवेस नित्य तयार असलेली पुस्तके हेच माणसांचे खरे मित्र, कारण ते काही हातचे राखून ठेवत नाहीत वा माणसाला फसवत नाहीत. ज्या पुस्तकांतील विचार चिरकाल टिकणारे असतात तीच पुस्तके चिरंजीव होतात. अशी पुस्तके त्रासलेल्या मनाला समाधान देतात.
हीत. कधी ते आपले अंतरंग खुले करत नाहीत. ते आपणापासून काहीतरी लपवून ठेवतात. परंतु पुस्तकाचे तसे नाही. त्याला जवळ करण्याचा अवकाश की ते अंतरंग खुले करतात. ते कधी फसवत नाही, कधी चुकवत नाही. नेहमी आपल्या सेवेस तयार असते.

मंगळवार, ७ ऑक्टोबर, २०१४

चला चला रे शाळेत

चला चला रे शाळेत आपुल्या सुंदर दुनियेत।।धृ।।
आहे शाळा आपली छान
स्वच्छ ठेवण्या राखू भान
भिंती चित्रांनी सजवू
सभोवती झाडे लावू
नीटनेटके राहून सारे आपण मिरवू ऐटीत।।१।।
परिपाठाचा महिमा थोर
आदर्शांना ठेवू समोर
गुरुजनांचा ठेवू मान
मुलगी मुलगा एक समान
खेळ खेळता फेर धरू या रंगून जाऊ गाण्यात।।२।।
अमोल धन हे ज्ञानाचे
लक्षण असे हे प्रगतीचे
सृष्टीच्या पुस्तकात जाऊ
पुस्तकातली सृष्टी पाहू
आनंदाचा ठेवा सारा दडला पानापानांत।।३।।
मोठे होऊन कसे जगावे
अभ्यासातून हेच शिकावे
शिकता शिकता ज्ञान आपुले
कृती कराया सिद्ध असावे
तनात शक्ती मना युक्ती प्राप्त करू या जोषात।।४।।
मानवतेचा धर्म महान
समभावाचे गौरवगान
विज्ञानाचा मंत्र स्मरू
सारे मिळून कष्ट करू
वैभवशाली या देशाला नेऊ पुढे अभिमानात।।५।।

दूर्वांचे महत्त्व (durvanche mahatva)

दूर्वां
श्री गजाननाच्या पूजेमध्ये रोज २१ किंवा २१ च्या पटीत दूर्वा पवित्र मानल्या आहेत. ऋग्वेद व नंतरच्या ग्रंथांत दूर्वांचा उल्लेख आला आहे. मराठीत हरळी, हिंदीत दूब, गुजरातीत दरो, कन्नडमध्ये गिरके हळळू, तर संस्कृत भाषेत शतग्रंथा असे म्हटले जाते. वैज्ञानिक भाषेत 'सायनोडॉन डॅक्टिलॉन' असे म्हटले जाते. ही वनस्पती जननक्षम असून संघ करून वाढणारी आहे. हे एक परिचित, उपयुक्त, बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारे) गवत बहुतेक उष्ण देशांत सर्वत्र आढळते. हिमालयात २,४०० मी. उंचीपर्यंत व अनुकूल परिस्थितीत इतरत्र शेतात व बागेत तानासारखे वाढते. संस्कृत भाषेत याला सुमारे चाळीस नावे आहेत, वैदिक वाड्मयात शाण्डदूर्वा व पाकदूर्वा असे दोन प्रकार सांगितले आहेत. कौटिलीय अर्थशास्त्रात ताग, रुई, अळशी यांच्याबरोबर तिचा अंतर्भाव तृनावार्गात केला आहे. हिचे खोड जमिनीवर किंवा थोडे पृष्ठभागाखाली आडवे वाढून खूप लवकर पसरते, पेर्यांपासून लहान उभ्या फांद्या व त्यावर हिरवीगार, रेषाकृती, साधी, बारीक, गवतासारखी पणे येतात तसेच फांद्यांच्या टोकास पुढे २ - ६ कणिसांचा चवरीसारखा फुलोरा येतो. त्यावर बिनदेठाचे कणिस येते. त्या प्रत्येकात तुसांनी वेढलेले एक व्दिलिंगी फूल असते. साधारणपणे पावसाळ्यानंतर फुले येतात. फुलात तीन केसरदले किंजल्क येतो. तर फळ शुष्क, एकबीजी व न तडकरणारे असते. इतर शारीरिक लक्षणे तृण कुंलात वर्णिल्याप्रमाणे असतात. नवीन लागवड तुकडे लावून किंवा बिया फोकून करता येते. जमिनीची धूप थांबवण्यास व खेळाच्या मैदानांवर याची लागवड करतात. बंगल्याच्या आवारात, सार्वजनिक बागेत याचीच हिरवळ करतात. गुरांना, सशांना, सशांना व मेंढ्यांना याचा चारा आवडतो. हे गवत स्तंभक म्हणजे आकुंचन करणारे. लघवी साफ करणारे असून जखमेवर पानांचा रस लावतात. याच्या मुळचा थंड पाण्यात भिजवून काढलेला रस रक्ती मुळव्याधीवर देतात. मुळांचा काढा मुत्रल असून उपदंशात देतात. वेदनादायी सूज, अतिसार, अपस्मार, आमांश इत्यादींवरही दूर्वांचा रस उपयुक्त असतो. उचकी थाबवण्यास दूर्वांच्या ताज्या मुळ्यांचा रस आणि मध एकेक चमचा एकत्र करून चटण्यास देतात, तर अशी ही बहुगुणी दूर्वा फक्त पुजेसाठीच नाही, आरोग्यासाठी देखाल अत्यंत फलदायी आहे.