
पुस्तकांचे पुष्कळ प्रकार असतात. काही पुस्तके अल्पायुषी तर काही दीर्घायुषी असतात. त्यांचे आयुष्य त्यांच्यामधील विचारांवर अवलंबून असते. विचार जितके स्थायी, तितकी पुस्तके स्थायी. वर्तमानपत्राचे आयुष्य एक दिवस. सकाळी उत्साहाने व आतुरतेने आपण ते वाचतो. पण त्याचे पारायण करत नाही. मासिकाचे आयुष्य एक महिना. परंतु, काही पुस्तके सदासर्वकाळ बहुमोल असून तप्त मनाला समाधान देतात. भगवद्गीरा, बायबल, कुरण, वेद वगैरे ग्रंथ ह्या प्रतीचे होत.
सारांश : माणसांच्या सेवेस नित्य तयार असलेली पुस्तके हेच माणसांचे खरे मित्र, कारण ते काही हातचे राखून ठेवत नाहीत वा माणसाला फसवत नाहीत. ज्या पुस्तकांतील विचार चिरकाल टिकणारे असतात तीच पुस्तके चिरंजीव होतात. अशी पुस्तके त्रासलेल्या मनाला समाधान देतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा